Monday, December 30, 2019

पान उलटूनी ...

पान उलटूनी .... 


स्मार्ट फोनवर सतत बोट फिरवावीत. दर दोन मिनिटांनी काही नविन व्हॉटस अप आलय का बघाव ... नसेल तर फेसबूक इन्स्टाग्रामवर काही नोटिफिकेशन आलय का चेक कराव.... पण सतत तेच ते करुन बोअर झाल की मग वळाव मोठ्या पडद्याकडे अन् हातातल्या रिमोटच बटण दाबाव.... !


न्यूज चँनेलवर त्याच त्या बातम्या नाहीतर रटाळ कर्णकर्कश्श चर्चा .......! फिल्मी चँनल्सवर सतत चालणारे तेच ते सिनेमे नाहीतर साऊथच्या डब केलेल्या देमार फिल्म्स ! त्यामुळे वैतागलेल पब्लिक सतत नवनवीन पर्याय शोधत असतं. मोठ्या पडद्यावरील चँनेल्सच्या तुंबळ गर्दीत अँमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्सने इ. यांनी आपल बस्तान बसवलय अस वाटत असतांना वेब सिरीजच आगमन सांगून गेल कि येणारा जमाना आमचा आहे. 


मल्टिप्लेक्स, नाटक हा ऑप्शन म्हणजे खिशाला पाच सातशे रुपयाला चाट ! वीकेंडला मॉलमधल विंडो शॉपिंग टाईमपास ! पण खर सांगायच तर या सगळ्यातून मिळत काहीच नसतं .... मात्र .... हे अस्थिर मन अधिकच चंचल, अस्वस्थ होत चाललय अस आतून जाणवत ! केव्हातरी हे सगळे बंद करून मला नेमके काय हवय ? आणि मला नेमके काय आवडतय ? या दोन प्रश्नांचा शोध घेण्यासाठी डोळे बंद करून शांतपणे विचार करायला हवा .... हे एक प्रकारच मेडिटेशनच म्हणायच की !


अवती भवती नजर टाकली तर अस चंचल, अस्थिर, अस्वस्थ व अधीर असलेल समाजमन पहायला मिळत. या सगळ्या भाऊ गर्दीत पुस्तके आणि वाचन संस्कृती अडगळीत पडल्याची भावना एखाद्या निवांत क्षणी मनात अधिक दृढ होते. काय वाचाव .... ? ऐतिहासिक, ललित, सस्पेन्स थ्रिलर, अध्यात्मिक, विनोदी, कादंबरी, प्रवासवर्णन, लघुकथा कि नाट्यछटा ? काही ठामपणे सांगता येईल का कि आपल्याला वाचायला नेमक काय आवडतय ते ? 


शेवटच पुस्तक कोणत वाचल होत ? अस विचारल तर आठवणारही नाही. कदाचित पुस्तकाचा विषय अंधूक आठवेल पण नाव आठवणार नाही. पुस्तकाच नाव त्याचा विषय आठवला तर कदाचित लेखकाच नाव आठवणार नाही.... ! हे अस होणही आता अंगवळणी पडत  चाललय. 


नविन वर्षात मनाची चंचलता, अस्वस्थता संपवायची ! हे "पान उलटवून" पुढच्या पानावर नविन सुरवात करायची.... विषय अगदी कोणताही असो ... एक पुस्तक नेटाने वाचून संपवेन असा संकल्प करायचा. आजवर प्रत्येक वर्षी नविन वर्षाचा संकल्प केला असेल. तो पूर्ण झालाय किंवा कस याचा हिशोब नको आता मांडायला, नाहीतर या संकल्पाचही तसच व्हायच. त्यामुळे हा वाचन-संकल्प मात्र जानेवारीतच पूर्ण करायचा !  


संकल्पातला पुढचा भाग महत्वाचा ! वाचलेल्या पुस्तकाचे नाव अन् त्याबद्दल मला काय वाटल ? यावर जमतील तशा दहा बारा ओळी आपल्या शब्दात लिहून आपण सोशल मिडियावर व्यक्त व्हायच. नाहीतरी सोशल मिडियावर फालतूगिरी आपण बऱ्याचदा करतच असतो. मग अतिरेक झाला कि याच सोशल मिडियावर चालणाऱ्या फालतुगिरीला शिव्या घालत बसतो. पण नविन वर्षात याच प्लँटफॉर्मचा अशा पोस्ट टाकून छान वापर करायचा ! 


आपल्या फेसबुक, व्हॉटस् अप ग्रुपवरील दोस्तांना आपली ही पोस्ट वाचून ते पुस्तक वाचाव अस वाटल पाहिजे. आपण सगळ्यांनी अशा पोस्ट टाकायच ठरवल तर फेब्रूवारीत आपल्याला अशा असंख्य वाचनीय पुस्तकांविषयी माहिती मिळावी. त्यातली काही जमतील तशी विकत घ्यावी व वाचून पुनः पुनः व्यक्त होत रहाव .... आपल्या सोशल मिडियावरच्या जगतात आपल्या ग्रुप्सचा साहित्यिक कट्टा आपणच तयार करायचा ! सगळ्यांना सगळी पुस्तक विकत घेण जमेलच अस नाही पण आपसात एक्स्चेंज तर नक्कीच करता येतील ! 


चला तर मग आपल्या सवयींच "पान उलटूया", टीट्वेंटी वर्षात आपल्या सवयीत "बीस-उन्नीस"चा तरी फरक करुया, आपल बुक शेल्फ समृद्ध करुया ! आपण सगळ्यांनी ठरवल तर ते सहज शक्य होईल. मग करताय संकल्प दरमहा एक पुस्तक वाचनाचा ? 

नविन वर्षाच्या खुप साऱ्या शुभेच्छा ! 💐💐


© बिंदुमाधव भुरे, पुणे. 
८६९८७४९९९०/९४२३००७७६१
bnbhure@rediffmail.com


 

Friday, December 20, 2019

मेंटेनंस कि रिपेयर

मेंटेनंस कि रिपेयर

रस्त्यात बंद पडलेली स्कूटर ढकलत गँरेजपर्यंत न्यावी कि मेकँनिकला फोन करावा या विवंचनेत दिग्या होता. त्याचा नेहमीचा गँरेजवाला त्याच्या घराजवळ होता. खर तर तो त्याचा बालमित्रच ! कॉलेजमधेही दोघे एकत्र होते. बीकॉम नंतर त्याने सरळ गँरेज टाकल. नोकरी करायची नाही हे त्याच पक्क ठरलेल. यंत्र, त्याची डिझाईन्स, मेकँनिझम यातच तो सदैव रमलेला असायचा ! अनेकदा दिग्या निवांत टाईमपास गप्पाला त्याच्या गँरेजवर बसायचा. 

 
पुढच्या चौकात एक गरेज होते.  तेथपर्यंत गाडी ढकलत न्यायलाही काही प्रॉब्लेम नव्हता. पण तिथला मेकँनिक लगेच गाडी पाहिलं का ? अमुक पार्ट गेलाय, तमुक पार्ट गेलाय, हे बदलायला लागेल ते बदलायला लागेल असल काही त्याने सांगितल तर ? दिग्याला एकदम इनसिक्यूअर वाटून गेल. शेवटी रस्त्याच्या कडेला स्कूटर लावून दिग्याने गँरेजला फोन केला.

 
 “हँलो” .. “हा बोला साहेबा, काय पडली का बंद परत?” पलीकडून हसत एमडी चा आवाज. मंगेश ढोमणे ! त्याच्या गरेजचे नावही एमडी ऑटो असेच होते. 

“होना यार ! हल्ली वारंवार अस होतय. जरा बघशील नीट या वेळी. लागेल तर एक दिवस गाडी ठेव गँरेजला” दिग्या बोलला. 

“गाडीची किल्ली सोडून जा, बघतो काय झालय ते अन् संध्याकाळी सांगतो” एमडीचे उत्तर !

 
दिग्या संध्याकाळी गँरेज वर हजर ! एमडीने एस्टिमेट तयार ठेवल होत. आकडा वाचून दिग्याची बोलती बंद झाली. तो एमडीकडे व कागदाकडे आळीपाळीने नुसता पाहत होता. “मंग्या लेका चेष्टा करतोस का ? इतके एस्टिमेट ? अरे साधी स्कूटर आहे लेका, चार चाकी नाही.” एमडीने हातातले काम बाजूला ठेवले. "कोयलेकी दलालीमे हाथ काले होते है" या डायलॉगला लाजवतील असे ऑइलचे काळे हात त्याने त्याच रंगाच्या कळकट कापडाला पुसले. हात स्वच्छ झाले कि कापड आणखीन काळ झाल ? हा संशोधनाचा विषय ठरावा. तो दिग्याजवळ आला. गँरेजाच्या कोपऱ्यात त्याचे टेबल होते. त्याकडे हात करत म्हणाला “ये, बसून बोलूया”

 
एस्टिमेटचा कागद हातात घेत मग एमडी दिग्याला समजावून सांगू लागला. “स्कूटरचे दोन पार्ट बदलायला लागणार आहेत कारण हे रिपेयर होऊ शकत नाहीत अन् ऑईल लिकेजमुळे पूर्ण इंजिन डाऊन करून सर्विसिंग कराव लागणार आहे. आणि याला काहीच पर्याय नाही. तुझ्यासाठी दिग्या, लेबर चार्जेस कमी लावेन पण स्पेयर्सचे चार्जेस ? ते कसे टाळणार ?" 

 
"पण हे अचानक अस का झाल ? स्कूटर चालवतांना तर काहीच प्रॉब्लेम नव्हता ?" दिग्याने भाबडेपणाने बोलला. दिग्याकडे दिवसभरात येणाऱ्या ग्राहकात व्हरायटी भरपूर होती. बहुसंख्य लोक "तात्पुरत काही तरी करुन गाडी सुरु करुन द्या. मग नंतर टाकतो रिपेयरिंगला" अस म्हणणारे किंवा "पुढच्या सर्व्हिसिंगला करु" अस म्हणणारे. अशा ग्राहकांना एमडी प्रवचन द्यायचा. तो जे काही बोलायचा ते ज्ञान त्याने कुठून पैदा केल असेल ? हा प्रश्न कोणालाही पडावा. टाईमपास गप्पांना आलेल्या दिग्याच्या कानावरही ही प्रवचने अनेकदा पडलेली ! पण तेवढ्यापुरतीच ! मेंदूत शिरायचा रस्ता बहुतेक बंद असायचा.  

 
आज ते एस्टिमेट पाहून दिग्याचा तो बंद रस्ता ओपन झाला होता. एमडी बोलत होता. "अस अचानक वगैरे काही होत नसत दिग्या ! आपण कॉमर्स ग्रँज्युएट. अकाऊंटस् शिकतांना बँलन्सशीट शिकलो. एखादा प्रॉब्लेम सोडवतांना बँलन्सशीट टँली करायच तर त्या प्रश्नात खाली दिलेली प्रत्येक "अँडजस्टमेंट" बारकाईने वाचावी लागते. आयुष्याच्या बँलन्सशीटमधे मात्र अशा "अँडजस्टमेंट" आपण डोक लावून कधीच सोडवत नाही तर त्या अँडजस्टमेंटशी "कॉम्प्रोमाइज" करुन मोकळा होतो."

दिग्याच्या चेहेऱ्यावर भल मोठ प्रश्नचिन्ह ... "म्हणजे काय ? मी नाही समजलो" इति दिग्या ..

"आता हेच बघ ना ... ब्रेक लूज झाले असतील, नीट लागत नसतील तर आतले ब्रेकशू बदलायला पाहिजे अस आम्ही सांगतो. ब्रेकशू बदलणे ही "अँडजस्टमेंट" सोडवली कि स्कूटरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह ... अँक्सिडेंटचा धोका कमी ... ! पण गिऱ्हाईक म्हणतात ब्रेक तात्पुरते टाईट करुन द्या. हे झाल "कॉम्प्रोमाइज" ! "अँडजस्टमेंट" शब्दाच्या डिक्शनरी अर्थामुळे दिग्याचा उडालेला गोंधळ जरा क्लियर झाला." 

 
एमडीच प्रवचन कंटीन्यू ...  "बँलन्सशीट शिकतांना रिपेयर्स अँड मेंटेनन्स हा आयटेम आठवतोय का रे दिग्या ? तेथे हे दोन्ही शब्द एकत्र असतात अगदी राम लक्ष्मणासारखे ! पण आयुष्याच्या बँलन्सशीटमधे मात्र या दोन शब्दांना वेगवेगळे करायला हव. कारण वेळच्या वेळी नियमित “मेंटेनन्स” केला नाही तर “रिपेयरी”चा मोठा खर्च अंगावर पडतो. कित्येक कंपन्यात हल्ली AMC - ANNUAL MAINTAINANCE CONTRACT असते बघ ! तुमच्या SYSTEM ला, मशीनला काही प्रॉब्लेम असो अगर नसो, नियमित कालावधीने त्याची देखभाल केली तर दीर्घकाळ त्या विनातक्रार काम करतात.”

 
“पण अगदी तुझ्यासकट अनेक मंडळी नियमित मेंटेनन्सचा खर्च वाचवायला बघतात अन स्कूटर बंद पडल्यावरच येता त्यामुळे तुम्हाला रिपेयरीचा मोठा खर्च तर करावा लागतोच शिवाय ऐनवेळी होणाऱ्या मनस्तापाला सामोरे जावे लागते ते वेगळेच ! दिग्या लेका, तुला यापूर्वी मी अनेकदा सांगितले कि दर सहा महिन्यांनी किंवा साधारण दोन हजार किलोमीटर रनिंग झाले कि स्कूटर आणत जा. त्या वेळेला किरकोळ मेंटेनन्स खर्चात काम होते आणि गाडी पण नीट रहाते. दिग्या लेका, आपली गाडी तिच्या भाषेत केव्हातरी सिग्नल देत आपली तक्रार सांगत असते. आपण ते लक्षात घ्यायला हव यार." 


दिग्या मान डोलवत दाद देत होता.  दिग्या हा एमडीचा खास दोस्त असल्यामुळे एमडीने आणखी पुढचा गियर टाकायच ठरवल "आपल्या शरीराचेही तसेच आहे दिग्या !सर्दी पडस झाल, किरकोळ ताप आला तर आपण डॉक्टरकडे न जाता बऱ्याचदा दुखण अंगावर काढतो. एखाद्या वेळी हे ठीक आहे पण ही सवय लागून जाते आपल्याला ! थकवा येणे, छातीत कळ येणे, अकारण घाम येणे, डोके सतत जड होणे, अकारण चक्कर येणे यासारख्या माध्यमातून आपल शरीरही सिग्नल्स देत असते. त्याकडे दुर्लक्ष करुन कस चालेल ?  नियमितपणे म्हणजे वर्षातून एकदा संपूर्ण हेल्थ चेक अप करणे हे पण मेंटेनन्स सदरात मोडते. शेवटचा हेल्थ चेक अप कधी केला आहेस ? काही आठवतय का ?” दिग्या मंदसा हसला व मान आडवी हलवत नाही म्हणाला.

 
एमडीने मग आणखी पुढचा गियर टाकला .. “गाडीत टाकलेल्या पेट्रोलमधे भेसळ असली की स्कूटर इंजिन कुरकूर करते ना ? आपण लगेच तो पेट्रोल पंप अव्हॉइड करतो. पण तब्येत बिघडू नये म्हणून आपण तसेच कॉशस का नसतो ? फास्ट फूड, जंक फूड. चायनीज ... हे एक प्रकारे भेसळयुक्त इंधन आहे की रे !  “आपल्या इंजिनावर” त्याचा काय परिणाम होतो याचा विचार आपण कधी करणार ? टायरच एयरप्रेशर तर आपण कधी चेकच करत नाही. डायरेक्ट पंक्चर झाली कि मगच तपासायच ! तसच ब्लडप्रेशरच आहे. चक्कर आली, अंधारी आली, गरगरतय म्हटल कि डॉक्टरकडे ! तिथेच बीपी चेक होणार."


एमडीने आता टॉप गियर टाकला होता  "थोडा नीट विचार करुन बघ ... आता विषय निघालाय म्हणून सांगतो .. आज रासायनिक खतांचा अतिरेकी वापर करून विषारी झालेल्या जमिनीतून पिकणाऱ्या धान्यात सत्व असत का ? धावपळीच्या जीवनात वेळेअभावी जे झटपट मिळेल त्या खाण्यात पोषण मूल्य असतात का ? मग आपण भेसळीचा पेट्रोल पंप टाळतो तसे हे असले खाणे का टाळत नाही ? बँलन्स्ड डाएट ठेवला व जोडीला उच्च दर्जाच्या फूड सप्लीमेंटची जोड दैनंदिन आहारात दिली तर आपले इंजिन कुरकुर करणार नाही. हा खर्चही दिग्या आजकाल मेंटेनन्स सदरात मोडतो. हा ...  पण याच्या जोडीला रोज अर्धा तास व्यायामाला द्यायला हवा बर का ! गाडी सुरु करण्याआधी नीट फडक मारुन गाडी पुसतो न आपण तसच समज हव तर !”  


"दिग्या, हल्ली गाडी जुनी झाली कि एक्स्चेंज ऑफरमधे नविन आणतात. बाकी गोष्टींबद्दल तर बोलणच नको. यूज अँड थ्रोचा जमाना आहे. पण आपल तस नाही ना रे ! आपल्या शरीराच एजिंग सातत्याने सुरु असते. ते कोणाला चुकलय ? पण हे एजिंग हेल्दी ठेवल तर आपल इंजिन स्मूथ चालणार अगदी विनातक्रार ! किरकोळ तक्रारी नियमित मेंटेनन्समधे निघून जातात. वय वाढेल तस मेंटेनन्स खर्चात वाढ करत राहिल पाहिजे."


दिग्याला एमडी आज भलताच जिनियस वाटला. नट, बोल्ट, इंजिन, मेकँनिझम यात रमणाऱ्या मंग्याला "मेकँनिक संत गुरु" पदवी त्याने मनोमन बहाल केली होती. मशिन्स व त्यांचे डिझाईन याच्या अभ्यासाचा छंद असणाऱ्या एमडीने हे ज्ञान कुठून पैदा केल असेल ? हे एखाद्या टाईमपास गप्पात जाणून घ्यायच त्याने ठरवल होत.

"उद्या संध्याकाळपर्यंत होईल ना गाडी ?" दिग्याच्या टोनवरुन दिग्या कंन्व्हिन्स झालाय हे कळत होत. एमडी म्हणाला "ट्राय करतो. बहुतेक होईल. पण एक दिवस ट्रायलसाठी ठेवतो. वापरुन पाहीन, काही प्रॉब्लेम नाही याची खात्री पटली कि फोन करतो"!

"म्हणजे "आयसीयू तून बाहेर आणल कि एक दिवस आब्झरवेशन आणि नंतर डिस्चार्ज .. असच ना ?" दिग्याने हसून आंगठा दाखवत बोलला आणि थंम्स अप खूण करत मंग्याला दाद दिली. 


©बिंदुमाधव भुरे, पुणे.
९४२३००७७६१/८६९८७४९९९०
bnbhure@rediffmail.com
 
   

 

मेंटेनंस कि रिपेयर

मेंटेनंस कि रिपेयर

रस्त्यात बंद पडलेली स्कूटर ढकलत गँरेजपर्यंत न्यावी कि मेकँनिकला फोन करावा या विवंचनेत दिग्या होता. त्याचा नेहमीचा गँरेजवाला त्याच्या घराजवळ होता. खर तर तो त्याचा बालमित्रच ! कॉलेजमधेही दोघे एकत्र होते. बीकॉम नंतर त्याने सरळ गँरेज टाकल. नोकरी करायची नाही हे त्याच पक्क ठरलेल. यंत्र, त्याची डिझाईन्स, मेकँनिझम यातच तो सदैव रमलेला असायचा ! अनेकदा दिग्या निवांत टाईमपास गप्पाला त्याच्या गँरेजवर बसायचा. 

 
पुढच्या चौकात एक गरेज होते.  तेथपर्यंत गाडी ढकलत न्यायलाही काही प्रॉब्लेम नव्हता. पण तिथला मेकँनिक लगेच गाडी पाहिलं का ? अमुक पार्ट गेलाय, तमुक पार्ट गेलाय, हे बदलायला लागेल ते बदलायला लागेल असल काही त्याने सांगितल तर ? दिग्याला एकदम इनसिक्यूअर वाटून गेल. शेवटी रस्त्याच्या कडेला स्कूटर लावून दिग्याने गँरेजला फोन केला.

 
 “हँलो” .. “हा बोला साहेबा, काय पडली का बंद परत?” पलीकडून हसत एमडी चा आवाज. मंगेश ढोमणे ! त्याच्या गरेजचे नावही एमडी ऑटो असेच होते. 

“होना यार ! हल्ली वारंवार अस होतय. जरा बघशील नीट या वेळी. लागेल तर एक दिवस गाडी ठेव गँरेजला” दिग्या बोलला. 

“गाडीची किल्ली सोडून जा, बघतो काय झालय ते अन् संध्याकाळी सांगतो” एमडीचे उत्तर !

 
दिग्या संध्याकाळी गँरेज वर हजर ! एमडीने एस्टिमेट तयार ठेवल होत. आकडा वाचून दिग्याची बोलती बंद झाली. तो एमडीकडे व कागदाकडे आळीपाळीने नुसता पाहत होता. “मंग्या लेका चेष्टा करतोस का ? इतके एस्टिमेट ? अरे साधी स्कूटर आहे लेका, चार चाकी नाही.” एमडीने हातातले काम बाजूला ठेवले. "कोयलेकी दलालीमे हाथ काले होते है" या डायलॉगला लाजवतील असे ऑइलचे काळे हात त्याने त्याच रंगाच्या कळकट कापडाला पुसले. हात स्वच्छ झाले कि कापड आणखीन काळ झाल ? हा संशोधनाचा विषय ठरावा. तो दिग्याजवळ आला. गँरेजाच्या कोपऱ्यात त्याचे टेबल होते. त्याकडे हात करत म्हणाला “ये, बसून बोलूया”

 
एस्टिमेटचा कागद हातात घेत मग एमडी दिग्याला समजावून सांगू लागला. “स्कूटरचे दोन पार्ट बदलायला लागणार आहेत कारण हे रिपेयर होऊ शकत नाहीत अन् ऑईल लिकेजमुळे पूर्ण इंजिन डाऊन करून सर्विसिंग कराव लागणार आहे. आणि याला काहीच पर्याय नाही. तुझ्यासाठी दिग्या, लेबर चार्जेस कमी लावेन पण स्पेयर्सचे चार्जेस ? ते कसे टाळणार ?" 

 
"पण हे अचानक अस का झाल ? स्कूटर चालवतांना तर काहीच प्रॉब्लेम नव्हता ?" दिग्याने भाबडेपणाने बोलला. दिग्याकडे दिवसभरात येणाऱ्या ग्राहकात व्हरायटी भरपूर होती. बहुसंख्य लोक "तात्पुरत काही तरी करुन गाडी सुरु करुन द्या. मग नंतर टाकतो रिपेयरिंगला" अस म्हणणारे किंवा "पुढच्या सर्व्हिसिंगला करु" अस म्हणणारे. अशा ग्राहकांना एमडी प्रवचन द्यायचा. तो जे काही बोलायचा ते ज्ञान त्याने कुठून पैदा केल असेल ? हा प्रश्न कोणालाही पडावा. टाईमपास गप्पांना आलेल्या दिग्याच्या कानावरही ही प्रवचने अनेकदा पडलेली ! पण तेवढ्यापुरतीच ! मेंदूत शिरायचा रस्ता बहुतेक बंद असायचा.  

 
आज ते एस्टिमेट पाहून दिग्याचा तो बंद रस्ता ओपन झाला होता. एमडी बोलत होता. "अस अचानक वगैरे काही होत नसत दिग्या ! आपण कॉमर्स ग्रँज्युएट. अकाऊंटस् शिकतांना बँलन्सशीट शिकलो. एखादा प्रॉब्लेम सोडवतांना बँलन्सशीट टँली करायच तर त्या प्रश्नात खाली दिलेली प्रत्येक "अँडजस्टमेंट" बारकाईने वाचावी लागते. आयुष्याच्या बँलन्सशीटमधे मात्र अशा "अँडजस्टमेंट" आपण डोक लावून कधीच सोडवत नाही तर त्या अँडजस्टमेंटशी "कॉम्प्रोमाइज" करुन मोकळा होतो."

दिग्याच्या चेहेऱ्यावर भल मोठ प्रश्नचिन्ह ... "म्हणजे काय ? मी नाही समजलो" इति दिग्या ..

"आता हेच बघ ना ... ब्रेक लूज झाले असतील, नीट लागत नसतील तर आतले ब्रेकशू बदलायला पाहिजे अस आम्ही सांगतो. ब्रेकशू बदलणे ही "अँडजस्टमेंट" सोडवली कि स्कूटरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह ... अँक्सिडेंटचा धोका कमी ... ! पण गिऱ्हाईक म्हणतात ब्रेक तात्पुरते टाईट करुन द्या. हे झाल "कॉम्प्रोमाइज" ! "अँडजस्टमेंट" शब्दाच्या डिक्शनरी अर्थामुळे दिग्याचा उडालेला गोंधळ जरा क्लियर झाला." 

 
एमडीच प्रवचन कंटीन्यू ...  "बँलन्सशीट शिकतांना रिपेयर्स अँड मेंटेनन्स हा आयटेम आठवतोय का रे दिग्या ? तेथे हे दोन्ही शब्द एकत्र असतात अगदी राम लक्ष्मणासारखे ! पण आयुष्याच्या बँलन्सशीटमधे मात्र या दोन शब्दांना वेगवेगळे करायला हव. कारण वेळच्या वेळी नियमित “मेंटेनन्स” केला नाही तर “रिपेयरी”चा मोठा खर्च अंगावर पडतो. कित्येक कंपन्यात हल्ली AMC - ANNUAL MAINTAINANCE CONTRACT असते बघ ! तुमच्या SYSTEM ला, मशीनला काही प्रॉब्लेम असो अगर नसो, नियमित कालावधीने त्याची देखभाल केली तर दीर्घकाळ त्या विनातक्रार काम करतात.”

 
“पण अगदी तुझ्यासकट अनेक मंडळी नियमित मेंटेनन्सचा खर्च वाचवायला बघतात अन स्कूटर बंद पडल्यावरच येता त्यामुळे तुम्हाला रिपेयरीचा मोठा खर्च तर करावा लागतोच शिवाय ऐनवेळी होणाऱ्या मनस्तापाला सामोरे जावे लागते ते वेगळेच ! दिग्या लेका, तुला यापूर्वी मी अनेकदा सांगितले कि दर सहा महिन्यांनी किंवा साधारण दोन हजार किलोमीटर रनिंग झाले कि स्कूटर आणत जा. त्या वेळेला किरकोळ मेंटेनन्स खर्चात काम होते आणि गाडी पण नीट रहाते. दिग्या लेका, आपली गाडी तिच्या भाषेत केव्हातरी सिग्नल देत आपली तक्रार सांगत असते. आपण ते लक्षात घ्यायला हव यार." 


दिग्या मान डोलवत दाद देत होता.  दिग्या हा एमडीचा खास दोस्त असल्यामुळे एमडीने आणखी पुढचा गियर टाकायच ठरवल "आपल्या शरीराचेही तसेच आहे दिग्या !सर्दी पडस झाल, किरकोळ ताप आला तर आपण डॉक्टरकडे न जाता बऱ्याचदा दुखण अंगावर काढतो. एखाद्या वेळी हे ठीक आहे पण ही सवय लागून जाते आपल्याला ! थकवा येणे, छातीत कळ येणे, अकारण घाम येणे, डोके सतत जड होणे, अकारण चक्कर येणे यासारख्या माध्यमातून आपल शरीरही सिग्नल्स देत असते. त्याकडे दुर्लक्ष करुन कस चालेल ?  नियमितपणे म्हणजे वर्षातून एकदा संपूर्ण हेल्थ चेक अप करणे हे पण मेंटेनन्स सदरात मोडते. शेवटचा हेल्थ चेक अप कधी केला आहेस ? काही आठवतय का ?” दिग्या मंदसा हसला व मान आडवी हलवत नाही म्हणाला.

 
एमडीने मग आणखी पुढचा गियर टाकला .. “गाडीत टाकलेल्या पेट्रोलमधे भेसळ असली की स्कूटर इंजिन कुरकूर करते ना ? आपण लगेच तो पेट्रोल पंप अव्हॉइड करतो. पण तब्येत बिघडू नये म्हणून आपण तसेच कॉशस का नसतो ? फास्ट फूड, जंक फूड. चायनीज ... हे एक प्रकारे भेसळयुक्त इंधन आहे की रे !  “आपल्या इंजिनावर” त्याचा काय परिणाम होतो याचा विचार आपण कधी करणार ? टायरच एयरप्रेशर तर आपण कधी चेकच करत नाही. डायरेक्ट पंक्चर झाली कि मगच तपासायच ! तसच ब्लडप्रेशरच आहे. चक्कर आली, अंधारी आली, गरगरतय म्हटल कि डॉक्टरकडे ! तिथेच बीपी चेक होणार."


एमडीने आता टॉप गियर टाकला होता  "थोडा नीट विचार करुन बघ ... आता विषय निघालाय म्हणून सांगतो .. आज रासायनिक खतांचा अतिरेकी वापर करून विषारी झालेल्या जमिनीतून पिकणाऱ्या धान्यात सत्व असत का ? धावपळीच्या जीवनात वेळेअभावी जे झटपट मिळेल त्या खाण्यात पोषण मूल्य असतात का ? मग आपण भेसळीचा पेट्रोल पंप टाळतो तसे हे असले खाणे का टाळत नाही ? बँलन्स्ड डाएट ठेवला व जोडीला उच्च दर्जाच्या फूड सप्लीमेंटची जोड दैनंदिन आहारात दिली तर आपले इंजिन कुरकुर करणार नाही. हा खर्चही दिग्या आजकाल मेंटेनन्स सदरात मोडतो. हा ...  पण याच्या जोडीला रोज अर्धा तास व्यायामाला द्यायला हवा बर का ! गाडी सुरु करण्याआधी नीट फडक मारुन गाडी पुसतो न आपण तसच समज हव तर !”  


"दिग्या, हल्ली गाडी जुनी झाली कि एक्स्चेंज ऑफरमधे नविन आणतात. बाकी गोष्टींबद्दल तर बोलणच नको. यूज अँड थ्रोचा जमाना आहे. पण आपल तस नाही ना रे ! आपल्या शरीराच एजिंग सातत्याने सुरु असते. ते कोणाला चुकलय ? पण हे एजिंग हेल्दी ठेवल तर आपल इंजिन स्मूथ चालणार अगदी विनातक्रार ! किरकोळ तक्रारी नियमित मेंटेनन्समधे निघून जातात. वय वाढेल तस मेंटेनन्स खर्चात वाढ करत राहिल पाहिजे."


दिग्याला एमडी आज भलताच जिनियस वाटला. नट, बोल्ट, इंजिन, मेकँनिझम यात रमणाऱ्या मंग्याला "मेकँनिक संत गुरु" पदवी त्याने मनोमन बहाल केली होती. मशिन्स व त्यांचे डिझाईन याच्या अभ्यासाचा छंद असणाऱ्या एमडीने हे ज्ञान कुठून पैदा केल असेल ? हे एखाद्या टाईमपास गप्पात जाणून घ्यायच त्याने ठरवल होत.

"उद्या संध्याकाळपर्यंत होईल ना गाडी ?" दिग्याच्या टोनवरुन दिग्या कंन्व्हिन्स झालाय हे कळत होत. एमडी म्हणाला "ट्राय करतो. बहुतेक होईल. पण एक दिवस ट्रायलसाठी ठेवतो. वापरुन पाहीन, काही प्रॉब्लेम नाही याची खात्री पटली कि फोन करतो"!

"म्हणजे "आयसीयू तून बाहेर आणल कि एक दिवस आब्झरवेशन आणि नंतर डिस्चार्ज .. असच ना ?" दिग्याने हसून आंगठा दाखवत बोलला आणि थंम्स अप खूण करत मंग्याला दाद दिली. 


©बिंदुमाधव भुरे, पुणे.
९४२३००७७६१/८६९८७४९९९०
bnbhure@rediffmail.com
 
   

 

Thursday, November 14, 2019

वळणाचे पाणी वळणावर जाईल ?




 वळणाचे पाणी वळणावर जाईल ?

जगातील  सगळ्यात मोठी व जागृत लोकशाही म्हणून आपल्याकडे जग कुतुहलाने पाहते. भल्या भल्यांचे अंदाज चुकविणारी, राजकारण्यांना त्यांची योग्य जागा योग्य वेळी दाखविणारी सुजाण लोकशाही असेही मतदारांनी दिलेले कौल पाहून म्हटले जाते. २०१४ साली लोकसभेत अनपेक्षितपणे भाजपला एकहाती सत्ता सोपवितांना अन्य पक्षांना मतदारांनी धोबीपछाड दिला व मतदारांना गृहीत धरण्याची चूक करू नका असा संदेश पुन: एकदा या लोकशाहीमध्ये राजकीय पक्षांना मिळाला. २०१९ च्या निवडणुक प्रचारादरम्यान विरोधकांनी जे वातावरण निर्माण केले त्यावरून असे वाटत होते कि भाजपला पुनः २०१४ सारखी कामगिरी करून दाखविणे अवघड आहे.  प्रचार माध्यमे व विविध पक्षाच्या अंतर्गत सूत्रांची माहिती यंत्रणा यांनीही भाजपला एकट्याला बहुमत मिळणे शक्य नाही अशी हवा केली होती. राहूलचा राफेल व चौकीदारचोर रागात लागलेल्या टीपेच्या (बे)सूरावर मतदार डोलत असल्याचा भास वाहिन्या व माध्यमांनी निर्माण केला होता. परिणामी २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेने बरोबर (अन् बिहारमधे जेडीयू) जागावाटपात नमते घेत तडजोडीची भूमिका भाजपने स्वीकारली हे उघड सत्य आहे. प्रत्यक्षात निकालांनी सगळ्या माध्यमांना खोट ठरवित विरोधकांना चितपट केले अन राहूलबाबा मौनात गेले. या निकालाचा भाजपलाही आश्चर्याचा धक्का बसला असावा.  

२०१९ च्या लोकसभेच्या उत्तुंग यशामुळे भाजपा सुखावली तर सेना भविष्यात येऊ घातलेल्या विधासभेत युतीला उत्तम यश मिळणार याबाबत आश्वस्त झाली. मोदी मॅजिक संपलेल नाही तर जबरदस्त चालतंय यावर २०१९ च्या यशाने शिक्कामोर्तब केले होते. २०१४ पर्यंत कायम मोठा भाऊ म्हणवून दादागिरी करणाऱ्या सेनेला दुय्यम दर्जाची वागणूक मिळाल्यावर होणाऱ्या यातना काय असतात याचा अनुभव आला असावा असे त्यांनी गेली पाच वर्षे वठविलेल्या "सत्ताधारी विरोधक" या भुमिकेवरुन लक्षात येते. लोकशाहीमधे मतदारांनी पक्षाच्या पदरात टाकलेले मतांचे दान हे त्या पक्षाने केलेल्या कामगिरीचे मूल्यांकन असते. त्या मूल्यांकनानुसार सत्तेत बसायचे कि विरोधात हे ठरते असते. दोन पक्षांनी युती करून एकत्रित सत्ता स्थापन करायची असल्यास मतदारांनी केलेल्या मुल्यांकनाच्या आधारे सत्तेतील वाटा ठरायला हवा. बाळासाहेबांनी सेना मोठा भाऊ असतांना ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री हेच सत्तासूत्र मांडले होते. 

जन्माने मिळालेले मोठेपण कायम रहाते तर कर्माच्या आधारे मिळालेले मोठेपण टिकवावे लागते. बाळासाहेबांचा करिश्मा त्यांच्या पश्चात मतदारांना अपेक्षित नसला तरी ती उणीव मतदारांना जाणवत असतांना राजकीय पटलावर उदयास आलेल भाजपचे जहाल नेतृत्व व आक्रमक विस्तारीकरण मतदारांना जास्त भावत गेल. अन् स्वाभाविकच कर्तृत्वाच्या, कामगिरीच्या आधारावर मोठेपण त्यांच्याकडे चालत गेले. बाळासाहेंबाची सेना आता राहिली नाही ही मतदारांमधील धारणा दिवसागणिक दृढ होत गेली. त्यांचा करिश्मा ओसरला तसा सेनेचा जनाधारही आक्रसत गेला.  बाळासाहेबांच्या हयातीत त्यांना भाजपकडून मिळणाऱ्या मान सन्मान व आदराचे उद्धव व राज साक्षीदार होते. त्यामुळे बाळासाहेबांच्या नंतर ज्या सेनेमुळे महाराष्ट्रात भाजपला आपली मुळे रुजविण्याची संधी मिळाली त्या सेनेला कायम मोठे समजावे व तसाच मान भाजपने देत राहावे अशी हटवादी अपेक्षा सेना नेतृत्व उराशी कवटाळून होती. पण नेमके त्या विपरित मिळणाऱ्या वागणूकीतून त्यानी स्वतःची प्रतिमा गेल्या पाच वर्षात “सत्ताधारी विरोधक” अशी बनविली.  

ही प्रतिमा मतदारांना भावली नाही हे २०१९ चे निकाल सांगतात. भाजप असो वा सेना दोनही पक्षात मेगाभरती झाली. याचे एकमेव कारण युतीत असणाऱ्या कुरघोडीच्या राजकारणात दोघांनाही पूर्ण वर्चस्व हव होते. मेगाभरती हा एक किळसवाणा प्रकार होता कि जो मतदारांना भावला नाही आणि स्वाभाविकच या पक्षांच्या पारड्यात अपेक्षित असे मतांचे दान पडले नाही. आपला आक्रसणारा जनाधार वाढविण्यासाठी निवडणूकीत प्रथमच ठाकरे कुटूंबातील व्यक्ती उतरवून निवडणूकीचे आकर्षण केंद्र बनविण्याचा केलेला प्रयत्नही सेनेचा स्ट्राइक रेट वाढवू शकला नाही तर प्रचारादरम्यान ३७० वर दिलेला अवाजवी भर भाजपच्या प्रचारातील मुद्द्यांचे संतुलन गमावून बसला व भाजपलाही अपेक्षित यश मिळाले नाही. 

निकालाऩतर युतीला स्पष्ट बहुमत असूनही सेनेने मुख्यमंत्री पदाबाबद भूमिका घेत ताणून धरले. अशा दबावतंत्राचा वापर राजकारणात करणे हे नवीन नाही. मतदारांनी केलेल्या मूल्या़कनापेक्षा अधिक वाटा सत्तेत मिळावा म्हणून काही अंशी हे क्षम्य आहे. परंतु, हे करतांना कुठे थांबायचे व कुठे तडजोड करायची हे मनात ठरलेले असावे लागते. मुंबइकडे वेगवेगळ्या दिशेने धावणाऱ्या सेंट्रल व वेस्टर्नच्या लोकल ट्रेन दादर येथे एकत्र येतात. सुधीर मुनगंटीवार यांनी एबीपी माझाशी बोलतांना भाजप सगळ्या मुद्द्यांवर चर्चेस तयार आहे असे स्पष्ट केले होते. त्यावर २।। - २।। वर्ष मुख्यमंत्री या विषयावर पण चर्चा करणार का असे विचारले असता त्यांनी सगळे विषय असे पुनः स्पष्ट केले होते. या सूचक विधानात दडलेली संधी सेनेने साधायला हवी होती पण तसे लेखी द्या असा ताठरपणा दाखवून सेनेने आपली गाडी दादरवरुन पुढे नेत वेगळी दिशा पकडली.

पवार हे अत्यंत चाणाक्ष व धूर्त राजकारणी आहेत हे उभा महाराष्ट्र जाणतो. राजकारण साधतांना कोणाचा कसा उपयोग ते करुन घेतात हे नव्याने सांगण्याची गरज नाही. मेगाभरतीतून राष्ट्रवादीला पडलेले खिंडार हा त्यांच्यासाठी अस्तित्वाचा प्रश्न होता. लोकसभेच्या आधीपासून राज ठाकरेंच्यासारखी मुलुख मैदान तोफ त्यांनी गळाला लावली होती. लोकसभा निवडणूक प्रचारात त्याचा उपयोग करून घेतला तरी अपेक्षित यश त्यांच्या पदरात पडले नाही. विधानसभेच्या कॉंग्रेस सोबतच्या महाआघाडीत मनसेला स्थान मिळेल या आशेवर त्यांनी मनसेला ठेवले व शेवटी राजना एकट्यानेच लढावे लागले. कॉंग्रेसच्या जागा व जनाधार घटला असला तरी त्यांनी सेनेच्या अंगानेच वाटचाल करणाऱ्या मनसेला दूर ठेवणे पसंद केले हे लक्षात घेतले पाहिजे. राजकीय पटलावर एके काळी असलेला हा कट्टर विरोधक पवारांनी संपवला. निकाल जाहीर झाल्यानंतर सेनेच्या मुख्यमंत्रीपदाच्या आकांक्षांना धुमारे घालण्याचे काम करत त्यांनी सेनेला आघाडीच्या पाठिंब्याचे  गाजर दाखवत झुलवत ठेवले. सेनेने एनडीए मधून बाहेर पडण्याचा सल्ला देत गाजर आणखी जवळ आणले. एकीकडे राज्यपालांनी दिलेली मुदत उलटली तरी कॉंग्रेस आघाडीच्या पाठिंब्याचे पत्र नाही तर दुसरीकडे केंद्रातून सेना बाहेर अशा विचित्र कोंडीत सेनेला पकडून पवारांनी मेगाभरतीचा जणू बदला घेतला.  

संजय राउत यांच्या जहाल विधानांमुळे भाजप व सेनेतील दरी वाढत होती. ही जहाल विधाने उद्धवजींना भेटल्यानंतर येत होती कि पवारांना भेटल्यानंतर हा संशोधनाचा विषय ठरावा. किमान समान कार्यक्रमच्या नावाखाली कॉंग्रेसचा चर्चेचा घोळ सुरु आहे तर पवार आमची आघाडी असल्यामुळे आधी आमच्यात एकमत होणे आवश्यक आहे हे सांगतांना अधून मधून आम्हाला मतदारांनी विरोधात बसण्याचा कौल दिलाय हे पालुपद सुरु ठेवतायत. सत्तेच वाटप कसे करायचे यासाठी चर्चेच्या फेर्या सुरु आहेत. जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी अधून मधून शेतकऱ्यांचा कळवळा घ्यायचा किंवा शेतकऱ्याच्या बांधावर भेट देऊन वाहिन्यांमध्ये चमकायचे हे प्रकार सुरु आहेत. नेत्यांच्या स्तरावर एकमेकांवर अद्यापही अविश्वास असणारी महाशिव आघाडी अस्तित्वात आली आहे. पण, ज्या बाळासाहेबांकडे पाहून कट्टर शिवसैनिकांनी सेना गावकूसात वाढवली, तेथील स्थानिक काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्यांनी अंगावर घेतल ते सैनिक आज मनाने महाशिव आघाडी मान्य करत नाहीत. नेते मंडळी सत्तेसाठी एकत्र येतात पण हे मनोमिलन कार्यकर्ता पातळीवर होऊ शकत नाही या दाहक वास्तवाकडे डोळेझाक करणे सेनेला भविष्यात खूप त्रासदायक ठरू शकते.


कोणी काय गमावल व कोणी काय कमावल हे सरकार स्थापन झाल्यावर ते कसे चालते यावर ठरेल. आज वाटाघाटीअंती “जितं मया”च्या अविर्भावात मुख्यमंत्री पदाची शपथ घेत सत्ता स्थापन होईल. कॉंग्रेसला गाडण्याच्या आणाभाका घेणाऱ्या बाळासाहेबांचे नाव घेऊन त्याच कॉंग्रेसच्या पाठींब्यावर बाळासाहेबांचे मुख्यमंत्री पदी शिवसैनिक बसविण्याचे स्वप्न पूर्ण केल्याचा जयघोष साजरा होईल. उभ्या महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांची यापेक्षा मोठी फसवणूक दुसरी कोणतीही नसेल. अशा प्रकारचा विजय हा त्या क्षणाचा जल्लोश असेल कारण नंतर पाच वर्षे सरकार चालविण्याची कसरत पार पाडायची आहे. सद्य परिस्थितीत राज्याचे सिंहासन हे काटेरी आहे. ते प्रत्येकाला हवय पण काटे मात्र दुसऱ्याच्या नशिबी असावेत ही आंतरिची सुप्त इच्छा ! आज होऊ घातलेल्या त्रिपक्षीय सरकारमधे राष्ट्रवादी व काँग्रेस दोघांनाही गमवायचे काहीच नाही. सरकार उत्तम चालले तर त्यांना त्यांची गमावलेली स्पेस पुनः मिळवता येणार आहे व ही स्पेस भाजपकडची असावी ही सेनेसह सगळ्यांची इच्छा असणार. पण सरकार अपयशी ठरल्यास त्याच खापर सेनेवर फुटाव म्हणून काँग्रेस व राष्ट्रवादी दोषारोप करतील कारण त्यांची जुनी आघाडी आहे व त्यात सेना उपरी आहे. एकंदरित सेनेसाठी हा मोठा आतबट्ट्याचा डाव आहे. जनमानसात आजच त्यांची प्रतिमा डागाळली गेली आहे. मुख्यमंत्रीपद मिळवल्यामुळे ती सुधारेल असे समजण्याचे कारण नाही. पुनः मध्यावधी झाल्या तर सेना महाशिव आघाडी म्हणून लढल्यास त्यांच्या वाट्याला किती जागा येतील अन् स्वतंत्र लढली तर काय स्थिती होईल याचा विचार सेनेने केला असेल काय

तुर्त तरी काँग्रेस आघाडी भरपूर ताणणार व मुख्यमंत्री पदासाठी घायकुतीला आलेल्या सेनेला ते नमवणार. सत्ता स्थापनेत होणारा प्रत्येक क्षणाचा विलंब हा सेना आमदारांची चलबिचल वाढविणार आहे. कॉंग्रेस आघाडीच्या जाचक अटी  मान्य न झाल्यास भाजपकडे पुनः वळण्याचा एकमेव पर्याय शिल्लक राहील व त्यासाठी उद्धव ज्यांना मोठा भाऊ म्हणतात त्या मोदींची मध्यस्ती हा हुकूमी एक्का असेल. कारण सेना व भाजपा यांचा भगवा हा हिंदुत्वाचा आहे. हा भगवा केवळ झेंडा म्हणून एकवेळ राष्ट्रवादी काही काळ मान्य करेल पण कॉंग्रेस कदापि मान्य करणार नाही. तेव्हा वळणाचे पाणी वळणावर जाईल ही अपेक्षा बाळगूया.

सारखा भेटे सारख्यासी, पाणीच मिळे पाण्याशी ।
विजातीय द्रव्यासी, समरसता होणे नसे ।।
(श्री गजाननविजय अध्याय ६ श्लोक ५२)

© बिंदुमाधव भुरे, पुणे

 ९४२३००७७६१ / ८६९८७४९९९०

Wednesday, November 6, 2019

संजयचा अज्ञातवास आवश्यक !

*संजयचा अज्ञातवास आवश्यक*

सामान्य जनतेला न दिसणारा महाभारताचा *सामना संजय* पाहू शकत होता व त्याचे सविस्तर वर्णन तो धृतराष्ट्राला करत होता. कानावर पडणारे वर्णन ऐकून दुःखी व कष्टी होणे इतकेच धृतराष्ट्राच्या हाती होते. आत्यंतिक उद्वेगाने तो मनातील खदखद व्यक्त करतांना संजयला "हे अस का" असे विचारायचा पण *संजयने कधीच कौरव कसे चुकले किवा पांडवांची बाजू कशी बरोबर यावर भाष्य केल नाही.* जणू रणांगणात घडणाऱ्या सामन्यांचे *फक्त वर्णन करण्याऱ्या पत्रकाराच्या* भूमिकेत तो होता. 

कौरव पांडव यात *"ठरल्याप्रमाणे घडाव"* पण ते न झाल्यामुळे महाभारत घडल. आजचा संजय दुहेरी (?) भुमिकेत अवतरला आहे. तो पत्रकारही आहे आणि एक सैनिकही ! वार्तांकनात न्यायाची बाजू घ्यावी कि सोईची ? बाजू मांडतांना मी *सैनिक कि पत्रकार ?* बाळासाहेबांचा शिष्य म्हणवून घ्यायचे तर ज्याची संख्या जास्त त्याचा मुख्यमंत्री या *तत्वाचा सोईस्कर विसर* का पडावा ? संजय उवाच वर पक्षप्रमुखांनी अवाक्षरही न उच्चारण्यामागे *पुत्रप्रेम कि पक्षभूमिका ?* 

आज प्रत्येकवेळी संजय उवाच होतात तेव्हा "ही पक्षप्रमुखांची भूमिका" असे ते आवर्जून सांगतात. महाभारतात डावपेचाचा भाग म्हणून युद्धात *शिखंडीला पुढे केल होत.* त्यामुळे काही वेळा पत्रकार व सैनिक असणारा संजय कधी *शिखंडी भासतो* पण बहुतांश वेळा *शकूनीच वाटतो* कारण हा पक्षप्रमुखांच नाव पुढे करुन स्वतःच फासे टाकतोय.

महाभारताचे युद्ध १३-१४ दिवस चालले होते अस म्हणतात. त्यात सत्याचा विजय झाला तरी दोन्ही बाजूंची प्रचंड हानी झाली होती. आज जनमानसात असलेल्या दोन्ही पक्षांच्या प्रतिमेची हानी होते आहे. *आजच्या भांडणात ना कोणी कौरव ना कोणी पांडव !* मतदान करतांना हे *दोघेही आपलेच अस मतदारांनी मानले*. भाजपला मिळालेल्या जागांचा आकडाही *१०५* आहे. काँग्रेसी विचारसरणी विरोधात लढतांना *आपण एक आहोत हेच जणू हा आकडा सांगतोय.* 

त्यामुळे आता कोणत्याही *कृष्णशिष्टाईची वाट न बघता दोघांनीही एक पाऊल माघार घ्यावी कारण यातच दोघांचाही विजय आहे.* घराच्या चौकटीबाहेर सल्ला देणारे अनेक *कळीचे नारद* टपून बसले आहेत. त्यांच्या जाळ्यात अडकू पहाणाऱ्या *संजयला आता काही काळ अज्ञातवासात धाडावे.* जनतेचा कौल आम्ही विरोधात बसाव अस दोन्ही काँग्रेस वारंवार सांगतायत याचाच अर्थ *जनतेचा कौल भाजप सेना या दोघांनी सत्ता एकत्रित स्थापन करावी हाच आहे* त्याचा झालेल्या दिरंगाईबद्दल माफी मागावी व आदर करावा. 

*© बिंदुमाधव भुरे, पुणे.*

Tuesday, October 29, 2019

हीच ती वेळ

हीच ती वेळ 

काँग्रेसमुक्त भारत ही संकल्पना प्रत्यक्षात आणायची तर निवडणूकीत त्यांना पराभूत करायला हव. २०१४ ला व त्यानंतरही काही अपवाद वगळता मोठ्या प्रमाणात भाजपने ते साध्य केले अन् काँग्रेसचे अस्तित्व काही राज्यांपुरते मर्यादित राहिले. असे असले तरी या कालावधीत काँग्रेसी नेत्यांचे भाजपमधे पक्षांतर होण्याचे प्रमाण अत्यल्प होते. गेल्या काही महिन्यामधे मात्र काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उरला सुरला जनाधार संपविण्यासाठी तिकडच्या तालेवार नेते मंडळींना भाजपात प्रवेश देणे सुरु झाले. या प्रकारावरुन जेव्हा जेव्हा टीका व्हायची तेव्हा आम्हाला काँग्रेस नाही तर काँग्रेसी संस्कृती संपवायची असे स्पष्टीकरण दिल जायच पण त्या संस्कृतीत उभ आयुष्य घालवलेली ही मंडळी .... भाजपात आल्यावर त्यांच्या रोमारोमात भिनलेला (भ्रष्ट) काँग्रेसी विचार, संस्कार नष्ट कसा होईल ? 

एका रेषेशेजारी आणखी एक मोठी रेषा काढली तर आधीची रेष लहान दिसेल. पण आज प्रयत्न झाला तो त्यांची रेषा पुसून आपली मोठी दाखविण्याचा. या प्रयत्नात मूळ व खरी भाजप आहे तेवढीच राहिली मात्र मेगाभरती करुन ही रेषा मोठी दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. अशा घाऊक पक्षांतरामुळे भाजपाला भरती आली तर काँग्रेस राष्ट्रवादीला ओहोटी ! कधीकाळी दलबदलूंना स्वार्थी म्हणून हिणवले जाई पण आज त्याला समारंभपूर्वक सन्मानाने पक्षप्रवेश दिला जातोय. अशा कार्यक्रमाला इव्हेंटचे स्वरुप येऊन मेगाभरती हा सन्मानाचा सोहळा बनून गेला. हे कार्यक्रम व त्याच्या बातम्या पहातांना कोणताही आनंद होत नव्हता कारण  कार्यकर्त्यांनी निस्वार्थ भावनेने काम केल्यानंतर आपला उमेदवार निवडून आल्याचा आनंद तो खरा आनंद ! 

या प्रकाराचा अतिरेक होत राहिला आणि त्यालाच विजय मानण्यात मंडळी दंग होती. जनमानसाला मात्र हा प्रकार घ्रुणास्पद वाटत होता. आखाड्यात समोर कोणी पैलवानच नाही ही वस्तुस्थिती असली तरी प्रचारात असे बोलणे यात अहंकाराचा दर्प डोकावू लागला. विरोधी पक्षात आता कोणी मातब्बर नेतेच शिल्लक राहिले नाहीत मग विजय आपलाच, पुनः मीच येणार या आत्मविश्वासातही अहंकार जाणवू लागला. आत्मविश्वास असणे ही कौतुकाची बाब आहे पण जी गोष्ट मतदारांना समजते ती जितं मयाच्या अविर्भावात मांडण्याची गरज नव्हती. आता त्यांच्या २४ तरी सीट येतील का ?  प्रतिस्पर्ध्याला असे हिणवून कमी लेखण्यातला हा मग्रूर भाव माझ्यासारख्या कट्टर भाजप पाठिराख्यांनाही भावला नाही. 

एकिकडे सत्ताधाऱ्याचे हे चित्र व या तुलनेत विरोधी पक्षात उरलेला एकमेव मान्यवर नेता ! हा काही धुतल्या तांदळासारखा स्वच्छ नाही हे जग जाणून होत. पण तो या वयातहीअस्तित्वाची लढाई एकटा लढतोय ही बाब सामान्य मतदारांसाठी कौतुकाची ठरली, त्या नेत्याला सहानुभूती देऊन गेली. कारण अस्तित्वासाठीची लढाई ही त्वेषानेच लढली जाते, लढावीच लागते. सगळे नेते, सगेसोयरे सोडून गेल्यामुळे गलितगात्र झालेल्या या नेत्यावर त्या स्थितीत वार करण्याची चूक त्याच्या अस्तित्वाच्या लढाईला बळ देणारी ठरली आणि त्याला मिळत असलेली सहानुभूती अधिक ठळक होत तिने आपला परीघ विस्तारला. या नेत्याकडून लोकांच्या दैनंदिन समस्यांना भाषणात हात घालतांना सरकारच्या धोरणातील फोलपणावर आघात करणे सुरु होत. जमिन स्तरावर ही वस्तुस्थिती भाजपच्या लक्षात आली तरी त्यांनी प्रचाराची स्ट्रँटेजी बदलली नाही. 

३७० वर बोलणे तर मलाही खटकत होते. पक्षाच्या जाहिरनाम्यातील एक कलम पूर्ततेचा अभिमान असणे चांगलेच व त्या अर्थाने प्रचारात त्याचा मर्यादित उल्लेख पूरक ठरला असता. पण विकासाची केलेली कामे व त्या अनुषंगाने मांडलेले मुद्दे ३७० च्या प्रचारकी थाटामुळे झाकोळले गेले. पूराच्या तडाख्यात सापडलेल्या कोल्हापूर, सांगली भागातील मतदारांचा रोष मतपेटीतून प्रकटल्याचे दिसले. सरकारी यंत्रणा, स्वयंसेवी संस्था मदतीला धावून आल्या असल्या तरी अशा प्रसंगात कितीही मदत अपूरी ठरते आणि विरोधक या घटनेचे भांडवल बनवून सरकारवर टीका करु शकले. 

आज निकालानंतर भाजप व सेनेच्या जागात घट झाली व काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या जागा वाढल्या हे वास्तव आहे. पण २२० पार घोषणेने अपेक्षा वाढल्या होत्या त्या पार्श्वभूमिवर हे निकाल पाठ थोपटण्याच्या योग्यतेचे नाही हे मान्य करायला हव. आकडेवारी, टक्केवारी, स्ट्राइक रेट हे सगळ भाजपच्या बाजूने असले तरी विजयी मतांचे मार्जिन कमी झालय व त्याला चुकलेली स्ट्रँटेजी व प्रचारी भाषणात नकळत डोकावणारा अहंकार कारणीभूत आहे अस मला वाटत. राष्ट्रवादीला त्यांनी दिलेल्या एकहाती लढतीच्या तुलनेत चांगले यश मिळतांना ग्रामीण भागात गमावलेला जनाधार पुनः मिळवण्यात काही प्रमाणात त्यांना यश मिळालय.  

यश मेहनतीची सावलीसारखी पाठराखण करते. या नियमाला अपवाद असतो हे काँग्रेसच्या यशाने दिसून आले. कोणताही प्रथितयश नेता नाही, रँली नाही, गाजावाजा नाही तरीही विशेषतः विदर्भात त्यांच्या जागा का वाढल्या ?  अनेक तालेवार नेत्यांच्या पक्षांतरानंतरही काँग्रेसच्या जागांची संख्या टिकून कशी राहिली ? मतदारराजा काय विचार करतो ? या प्रश्नांचा विचार करता भाजपने जिंकायचे तर काँग्रेसमुक्त भारतासाठी नाही तर नव्या भारतासाठी, विकासासाठी ! सबका साथ  सबका विकासला जर सबका विश्वासची जोड द्यायची आहे तर मग त्याचे प्रतिबिंब मतपेटीत उमटायला हव. पण घटणारा जनाधार म्हणजे सरकारप्रती, नेतृत्वाप्रती घटणारा विश्वास अस समीकरण बनायला सुरुवात होण्याआधीच जाग झालेल चांगल ! आणि हीच ती वेळ जाग होण्याची, सावध होण्याची असे आतापुरते म्हणूया.

© बिंदुमाधव भुरे, पुणे
9423007761 / 8698749990
bnbhure@rediffmail.com

Tuesday, September 17, 2019

कमळाबाई सावधान !

*कमळाबाई "दक्ष"ता घ्या*

गेली अनेक वर्षे कमळाबाई काम करतायत. त्यांच काम एकदम चोख आणि शिस्तीच ! वेळ अवेळ झालेली त्यांना स्वतःलाही बिल्कूल खपत नाही. मालकांनी आखून दिलेल्या चौकटीत काम करणार. परिस्थिती नुसार कधी जास्त काम पडल तर तेही आनंदाने पार पाडणार जणू या घराची निःस्वार्थपणे आजन्म सेवा करायच व्रत घेतल असाव ! कित्येकजण काम, नीटनेटकेपणा, शिस्त याबाबद कमळाबाईंच उदाहरण देत असत.

सगळ्या घरांमधे असत तस याही घरात स्वयंपाकघरातल्या ओट्याच्या कॉर्नरला भांडी स्वच्छ करण्यासाठी सिंक आहे. त्याच्या खालच्या बाजूला असलेला पीव्हीसीचा पाईप हा बिल्डिंगच्या बाहेर भिंतीवर असलेल्या सँनिटरी आऊटलेटला जोडलेला आहे. काम सुरु असतांना फक्त पाणी वाहून जावे म्हणून सिंकचा आऊटलेट व पीव्हीसी पाईप याच्यामधे बारीक जाळी आहे.

या जाळीच काम असत कि सिंकच्या खालचा पीव्हीसी पाईप किंवा बिल्डिंगच्या भिंतीवरील पाईप आणि एकूणच ड्रेनेज सिस्टीम चोक अप करु शकणाऱ्या घटकांना सिंकमधेच थोपवून धरत फक्त पाणी वाहून जाऊ द्यायच. सगळ काम झाल्यानंतर या जाळीवर पाईप चोक अप करु शकणारे घटक, गाळ काढून फेकून द्यायचा.

किचनमधल्या सिंकचा महत्वाचा भाग असलेली ही जाळी हल्ली कमळाबाई काम लवकर व्हाव म्हणून मधूनच थोडा थोडा वेळ काढून ठेवू लागल्या आहेत. काम झटकन होईल व वेळ वाचेल हा त्यांचा प्रामाणिक हेतू असावा. पण त्यामुळे पीव्हीसी पाईप किंवा बिल्डिंगवरचा पाईप आणि एकूणच ड्रेनेज सिस्टीम चोक अप होण्याची प्रक्रिया नकळत सुरु झाल्याचे त्यांच्या लक्षात आल नसाव.

एक दिवस सिंकमधे पाणी तुंबेल व मग सगळेच काम ठप्प होईल. त्यादिवशी मात्र घरमालकाला घरातली व बिल्डिंगवरची आख्खी पाईपलाईन साफ करण्याच काम हाती घ्याव लागेल. त्यामुळे या इवल्याशा जाळीच महत्व कमळाबाईंच्या लक्षात घरमालकाने वेळीच आणून दिलेल ठीक राहील.

गेल्या काही दिवसांपासून भाजपमधे (आणि सेनेत) सुरु असलेली मेगाभरती पाहून तिकडची असली जाळीच मधून मधून काढून ठेवली जातेय का ? असा प्रश्न मनात डोकावतोय.

😊😊😊

© बिंदुमाधव भुरे, पुणे.

Thursday, September 12, 2019

सुशिला

 “सुशिला”

 

बँकेत येणाऱ्या ग्राहकांचे निरीक्षण नोंदविण्याची मला जणू सवयच लागून गेली होती. अशीच एक चाळीशी ओलांडलेली महिला, दिसायला काळी सावळी, पुढचे ३-४ दात वेडेवाकडे ! त्यामुळे कि काय बोलतांना खांद्यावरून येणारा पदर ती डाव्या हाताने ओढून तोंडावर धरत असे. स्वत:हून फार कमी बोलायची, बहुदा मानेनेच हो किवा नाही असे उत्तर द्यायची. दहा बारा तारखेपर्यंत पैसे भरायला व नंतर लागतील तसे घरखर्चासाठी काढायला यायची ! एक दोन वेळा “काय करता तुम्ही ?” असा प्रश्न विचारला होता पण तिने उत्तर दिले नाही. बहुदा मोलकरीण म्हणून काम करत असावी.  पैसे काढतांना लागणारी स्लीप ती कोणाकडून तरी भरून घ्यायची. तिची खाली फक्त सही असायची. “सुशिला” अगदी तीनच अक्षरे. ही तीन अक्षरे लिहायला तिला बराच वेळ लागायचा.  

 

दुपारी दोन ते अडीच, तिची येण्याची वेळ ठरलेली होती ! बहुतेक सगळ्या घरची काम उरकून घरी जातांना येत असावी. त्या दिवशी मात्र ती अगदी बँक बंद होता होता आली, सोबत बहुदा तिची मुलगी असावी. पैसे भरायची स्लीप तिने आत सरकवली. आज स्लीपवरचे अक्षर वळणदार, छान होते. त्या मुलीचे असावे कारण स्लीप भरतांना मी तिला पाहिले होते. “काय आज उशीर झाला ?” मी विचारले. तसे तिने नेहमीप्रमाणे खांद्यावरचा पदर डाव्या हाताने तोंडावर धरला. नुसती हसली असावी असे तिच्या किलकिल्या झालेल्या डोळ्यावरून वाटले. “ही मुलगी वाटत?”  तिच्या शेजारी उभ्या असलेल्या मुलीकडे पहात माझा प्रश्न ! “काय ग, काय करतेस तु ?” “बीकॉम, लास्ट इयरला आहे साहेब” तिने उत्तर दिले. मी कौतकाने हसून म्हटले “व्वा छान” ! आपल्या मुलीचे कौतुक करत आहेत पाहून सुशीलने तोंडावर धरलेला पदर डाव्या हाताने बाजूला करत बोलायला सुरुवात केली. “साहेब, लय हुशार हाय माजी पोरगी. मी लोकांचे धुनी भांडी करते. पण हिला नाय करू द्यायची असले काम ! ब्यांकेची परीक्षा देनार हाय ती. तिला मी नेमी सांगती कि ब्यांकेत कामाला लाग आन तुमच्यावानी काम कर म्हनून. म्या तिला नेमी तुमच हुदारन द्येत असती बगा.”

 

बँकेत काम करणारा एक साधारण माणूस कोणाचे तरी रोल मॉंडेल होऊ शकतो हा नवा शोध मला त्या दिवशी लागला. “अहो सुशीलाबाई, नक्की चांगली मोठी साहेब बनेल ती.”  सुशिला मनापासून हसली तसे तिचे वेडेवाकडे दात चमकले आणि उमगल कि ही तोंडावर पदर का धरते ते ! त्या नंतरही ती अनेकदा बँकेत आली पण पुन: तशी हसली नाही. एक दिवस तिने पैसे काढायची स्लीप आत सरकवली. आकडा वाचून “आज एकदम पंचवीस हजार ?” असे मी विचारताच डाव्या हाताने पदर बाजूला घेत ती हसली अन म्हणाली, “साहेब, लेकीच लगीन ठरलया. थोडा कपडा, भांडी कुंडी खरेदी करायाची हाय”. मी पैसे मोजतांना हसून मान डोलावत दाद दिली व म्हणालो “वाह, छान. अभिनंदन सांगा तिला” आणि पैसे-पासबुक तिला दिले. खर तर विचारायचं होत कि काय करतो मुलगा वगैरे पण आज रांग मोठी होती. पुढच्यावेळी आली कि विचारू असे ठरवले.

 

दिवाळी संपली आणि अचानक नोटाबंदी जाहीर झाली. बँकेत तुडुंब गर्दी होऊ लागली. रोकड टंचाईमुळे पैसे काढण्यावर निर्बंध आले होते. बँक सकाळी दहा वाजता सुरु व्हायची पण रोकड येईपर्यंत दुपारी एक वाजायचा. तोपर्यंत पैसे काढणारे बिचारे बसून असायचे. गेले काही दिवस गर्दीमुळे ग्राहकांशी बोलायलाही वेळ नसायचा. दुपारचे तीन वाजले असतील. समोरच्या कस्टमरने पैसे काढायची स्लीप व एक कार्ड आत सरकवले. लग्नाची पत्रिका होती ती ! मी कार्ड बाजूला ठेवले, स्लीपवरचा आकडा पंचवीस हजार होता. “सुशिला” अशी सही पाहून कार्डवर नजर टाकली. सुशिलाने मुलीच्या लग्नाची पत्रिका दिली होती. काचेतून मी तिचा चिंताक्रांत चेहरा पहिला. “इतके पैसे नाही देऊ शकत” हे वाक्य उच्चारताना माझा आवाज खोल गेला होता. आज डाव्या हाताने तिने पदराने डोळे पुसले तेव्हा मला तिचे दात पुन: दिसले. इतरांना दिले तेव्हडे म्हणजे चार हजार रुपये देतांना तिच्याशी नजर मिळविण्याचे धाडस मला झाले नाही. काहे दिवसांनी ती दुपारी आली व एका प्लास्टिक पिशवीत दोन बुंदीचे लाडू देत म्हणाली “साहेब, लय इचार न्हाय करत बसलो, रजिस्टर लगीन केल बगा !” साधनांची विपुलता असूनही अडचणींच्या अंधारात चाचपडणाऱ्या सुशिक्षित मंडळींच्या तुलनेत ही अडाणी सुशीला त्यामुळे मला कायम लक्षात राहिली.

---------------------------------------------------------------

श्री बिंदुमाधव भुरे (निवृत्त बँक ऑफ बरोडा)

स न २, हिस्सा न १क+२ब/१,

ओमकार कॉलोनी, विठ्ठल मंदिराच्या मागे,

कर्वेनगर, पुणे ४११०५२

९४२३००७७६१ / ८६९८७४९९९०      

Saturday, August 17, 2019

श्री निलेश चव्हाण - बायोडेटा

श्री निलेश चव्हाण यांचा बायोडेटा

1. जिद्द आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर एखादी व्यक्ती यशाची विविध शिखरे पादाक्रांत करत असतांना दरवेळी  एक नवा कीर्तिमान प्रस्थापित करत असते कारण अशा माणसाची स्पर्धा हे नेहमी स्वत:शीच असते. यशाचा असा सदैव चढता आलेख सांभाळताना यशाने हुरळून न जाता आपले पाय जमिनीवर घट्ट रोवून ठेवणे हे खूप थोड्या जणांना जमते व अशा मोजक्या व्यक्तींमध्ये स्कॉन प्रोजेक्ट्स प्रा. लि.चे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक श्री निलेश चव्हाण यांचे नाव सन्मानाने घ्यावे लागेल.

2. कोकण किनारपट्टीवरील चिपळूण जवळील एका छोट्याशा गावातील कै. शंकर चव्हाण हे निलेशजींचे वडील ! कै शंकरराव एक उत्तम प्रथितयश शिक्षक होते. गरिबीचे चटके सोसलेल्या शंकररावांना शिक्षणाचे महत्व ज्ञात होते त्यामुळे त्यानी या पेशाकडे व्यवसाय म्हणून कधीच पाहिले नाही. गरजू, गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना चाकोरीबाहेर जावून त्यांने सदैव मदत केली व असे शेकडो विद्यार्थी आज विविध क्षेत्रामध्ये सन्मानाचे जीवन व्यतीत करत आहेत.

3. अशा संस्कारात वाढलेल्या निलेशच्या प्रतिभेला बहर न फुटता तर आश्चर्य ! काहीतरी वेगळे करायचे हे स्वप्न उराशी तेव्हापासून त्याने बाळगलेल होत. लौकिक अर्थाने शिक्षण संपवून १९९३ साली सिविल इंजिनीयारींगचा डिप्लोमा घेतला व त्यांचा उमेदवारीचा काळ सुरु झाला. इंडस्ट्रीयल कंस्ट्रक्शन विभागात विशेष प्राविण्य मिळविण्याच्या दृष्टीकोनातून या व्यवसायातील खाचा खोचा समजून घेण्यासाठी उमेदवारीचा हा काळ आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाचा कालखंड होता असे ते मानतात कारण याच काळात त्यांच्या मनात दडलेल्या व्यावसायीकाच्या महत्वाकांक्षांना अंकुर फुटण्यास आरंभ झाला आणि ....

4. २००७ साली स्कॉन प्रोजेक्ट ही कंपनी अस्तित्वात आली. औद्योगिक बांधकाम क्षेत्रात पाऊल टाकल्यावर पहिल्याच वर्षी कंपनीची उलाढाल ही ₹ ३ कोटी इतकी होती तर आज एक तपानंतर व्यवसायाने ₹ ३०० कोटीचा टप्पा ओलांडला आहे. आरंभी जेमतेम १५ कर्मचारी असलेल्या स्कॉनच्या कुटुंबाची संख्या आज ४०० हून अधिक आहे. व्यवसायासाठी लागणाऱ्या साहित्याचे मूल्य ₹ ५ कोटी इतके आहे. गगनभरारी मारणाऱ्या स्कॉन प्रोजेक्ट्सचा गेल्या तीन वर्षातील एकत्रित व्यवसाय हा ₹ ७२६ कोटी इतका आहे. औद्योगिक बांधकाम क्षेत्रातील गेल्या २५ वर्षांच्या श्री निलेश सरांच्या अनुभवातून आज अखेर २५० हून अधिक प्रोजेक्ट्स यशस्वीपणे पूर्ण झाले आहेत. व्यवस्थापकीय कौशल्य, माणसे जोडण्याची विलक्षण हातोटी याबरोबरच अनेकांसाठी ते स्फूर्तीस्थान व प्रेरणा स्रोत राहिले आहेत. 

5. आपल्या कामात नीती मुल्यांची जोपासना करतांना व्यवसायाला अधिकाधिक स्पर्धात्मक रूप देत कंपनीतील तसेच साईट वरील ... प्रत्येक कर्मचारी, कामगार याला त्यानी आपल्या कुटुंबातील एक घटक मानत माणुसकी सदैव जपली. कामाच्या दर्जाबद्दल कधीच कोणतीच तडजोड त्यांना मान्य नाही. यासाठी प्रसंगी “वज्राहुनी कठोर” अशा रूपाचे दर्शन देतांना त्यांनी मागे पुढे पाहिले नाही. त्यामुळे निलेश सरांविषयी प्रत्येकाच्या मनात प्रेम, आपुलकी याच बरोबरीने आदरयुक्त दरारा राहिला आहे. आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम तेच द्यायचे हा जणू कंपनीचा अलिखित नियम त्यांनी बनवून टाकला. यासाठी कार्पोरेट जगतात असलेली ठराविक कार्यालयीन पदरचना ज्याला हायरारकी म्हणतात त्याच्या सीमा ओलांडून प्रत्येकाला आपल्या केबिनमध्ये मुक्त प्रवेशाचे धोरण त्यांनी राबविले आहे. “किंमत, दर्जा आणि वेळ” ही त्रिसूत्री कधीच नजरेआड होणार नाही याची ते स्वत: दक्षता घेतात व त्याबरोबरच “सुरक्षा” या चौथी महत्वपूर्ण कडीची त्याला जोड त्यांनी दिली. साईटवर कोणताही अपघात किंवा दुर्घटना होऊ नये म्हणून प्रत्येकाला नियमितपणे प्रशिक्षणाचे धोरण त्यानी राबविले आहे.   

6. सामाजिक बांधिलकीचे भान त्यांच्यातील सहृदयी माणसाने सदैव जपले. पिरंगुट भागातील अनेक विद्यार्थी यांना तसेच अनेक गरजवंतांना त्यांनी मदतीचा हात दिला. २०१४ साली गरीब व गरजूंना मोफत डायलिसीस करता यावे यासाठी डायलिसीस मशीनची सुविधा त्यांने उपलब्ध करून दिली. कंपनीतील कर्मचार्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलायचा आदर्श पायंडा निलेश सरांनी पाडला व त्याच बरोबर कंपनीतील प्रत्येकाचा वैयक्तिक, ग्रुप तसेच अपघाती विम्याचा खर्च हा कंपनीमार्फत करण्याची परंपरा त्यानी सुरु केली.

स्थापनेनंतर अवघ्या ५ वर्षात स्कॉन प्रोजेक्ट या ब्रँडची दखल औद्योगिक विश्वाने घेतली व

• २०१२ साली स्कॉनला पहिला पुरस्कार मिळाला तर आज अखेर स्कॉनच्या नावावर एकूण १५ पुरस्कारांची नोंद आहे.

• यात Birla Super Award २ वेळा,

• उत्कृष्ट दर्जासाठी  MSME Award, 

• सुरक्षेशी संबंधित PCERF safety Award लागोपाठ ३ वर्षे, 

• पर्यावरणाशी संबंधित CIDC Green Rating Award,

• अंतरराष्ट्रीय स्तरावरील  Asia’s Most Admired Award व

• नुकताच मिळालेला Bharat Nirman Award या पुरस्कारांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.

या शिवाय

• २०१४ साली बांधकाम व्यावसायिक संघटनेकडून YOUNG ENTREPRENEUR AWARD ने तर

. २०१५ साली त्यांना NRI FOUNDATION कडून  HIND RATTAN AWARD ने सन्मानित करण्यात आले.

• याच वर्षी ALL INDIA ACHIEVERS FOUNDATION ने त्यांना OUTSTANDING ACHIEVEMENT AWARD FOR INFRASTRUCTURE DEVELOPMENT प्रदान केले.

• २०१६ साली सिंगापूरच्या  BUSINESS EXCELLENCE & RESEARCH GROUP ने त्यांना  YOUNG ACHIEVER OF THE YEAR ICON OF SPACES या पुरस्काराने गौरविले

• तर याच वर्षी  पुन: एकदा ALL INDIA ACHIEVERS FOUNDATION ने INDIAN LEADERSHIP AWARD FOR CONSTRUCTION AND DESIGN साठी त्यांची निवड केली.

• या वर्षी म्हणजे २०१६ साली  MAHARASHTRA INDUSTRIAL & ECONOMIC DEVELOPMENT ASSOCIATION ने त्यांना  MAHARASHTRA BUSINESS EXCELLENCE AWARD प्रदान केला.

• यशाची ही कमान २०१७ आणखी उंच होत गेली या वर्षी त्यांना पुन: ३ पुरस्कार मिळाले. यात पहिला होता तो MAHARASHTRA INTERNATIONAL BUSINESS ASSOCIATION यांच्या कडून मिळालेला MARATHA BUSINESS EXCELLENCE AWARD 

• तर दुसरा होता ROTARY INTERNATIONAL द्वारे दिलेला ROTARY INTERNATIONAL VOCATIONAL EXCELLENCE AWARD.

• तिसरा पुरस्कार MCCIA द्वारे FIRST GENERATION SUCCESSFUL ENTREPRENEUR साठी  देण्यात आलेला MCCIA INNOVATION & ENTREPRENEURSHIP AWARD LATE SHRI KIRAN NATU UDYOJAKTA PURASKAR दिला गेला.

• २०१८ साली शिरपेचात मनाचा आणखी एक तुरा खोवला गेला. सिंगापूर येथील WHITE PAGE INTERNATIONAL याच्यातर्फे ASIA’S MOST ADMIRED LEADER हा पुरस्कार त्यांना देण्यात आला.

• २०१९ साली औद्योगिक बांधकाम विभागात उत्कृष्ट कामगिरी व विशेष उल्लेखनीय योगदानाबद्दल हुशार व्यक्तिमत्वाला देण्यात येणाऱ्या BHARAT NIRMAN AWARD साठी त्यांची निवड झाली.