Saturday, July 27, 2019

गर्लफ्रेंड

*गर्लफ्रे़ड*

सध्याच लाईफ एकदम स्ट्रेसफूल ! हा स्ट्रेस सतत डाऊनलोड करत रहावा लागतो. त्यासाठी मग भरमसाठ टीव्ही चँनेल आहेतच. पण अस्थिर मन एका चँनेलवर सलग पाच मिनिट थांबेल तर शपथ ! तेच ते पिक्चर्स नाहीतर साऊथच्या हिंदी डब मुव्हीज ! तेही बोअर होतय म्हटल्यावर राहतय काय तर सिरियल्स ... त्या तर डोक्यात जातात. मग टाईमपास अन् विंडो शॉपिंगसाठी मॉलमधे जायच किंवा मल्टिप्लेक्स !

अस काहीस तुमच झालय आणि तुम्हाला डोक्याला शॉट नकोय का ? तर मग बिनधास्त जा आणि "गर्लफ्रेंड" पाहून या. *या पिक्चरच एक बरय .. काही शिकवायच्या किंवा सामाजिक संदेश द्यायच्या भानगडीतला हा पिक्चर नाही.* पिक्चरच्या नावावरुन "मॉम डँड" कँटेगरीनी नाक मुरडायच कारण नाही किंवा बँचलर्सनी हुरळूनही जायच नाही. कपल्सनी तर आपल्या मुलांसह बिनधास्त पहावा असा पिक्चर आहे. फेसबुक व सोशल मिडियाच्या प्रेमात असणारी तमाम मंडळी पिक्चर मधल्या हिरोशी कनेक्ट होतील. आयटीवाली मंडळी वीकेंडला गाडी काढून लाँग ड्राइव्हला जाणार, थंडगार बीयर, स्विमिंग पूलमधे रिलँक्स होत लाइफ मस्त एंजॉय करणार .. या कँटेगरीला तर आरशात पाहिल्यासारखच वाटेल ! पण बीयर, नॉनव्हेज मधले आम्ही नाही बुवा, आम्हाला आपल गरम कांदा भजी कॉफीतच मज्जा येते म्हणणाऱ्यांनी पण जरुर गर्लफ्रेंड पहावा.

पिक्चर सुरु झाल्यानंतर १५-२० मिनिटात नचिकेतचा लोचा प्रेक्षकांच्या लक्षात येतो. त्याच्या गर्लफ्रेंडच्या एंट्रीची उत्सुकता शिगेला पोहोचते आणि आलिशा उर्फ पायलची एंट्री होते. खरा पिक्चर इथून हालतो अन् प्रेक्षक एकदम इनवॉल्व होतात. *नचिकेतच कँरँक्टर एकदम बिच्चारा, पापभिरु दाखवलय ! इतक कि फक्त "मना सज्जना .... " मनाचे श्लोक म्हणायचा बाकी आहे. अमेय वाघ त्यात पूर्ण घुसलाय म्हणायला हरकत नाही*. तर आलिषा उर्फ पायल या कँरँक्टर थोड गुढतेच वलय देत ते कलेकलेने रंगवत नेलय. *सईने यात दिलेला परफॉरमन्स लाजवाब आहे. तिच्या भुमिकेला असलेल्या शेड्सची रेंज खूप वाईड आहे आणि या शेड्समधे रंग भरण्याचे काम तिने लिलया केलय. तिच्या डोळ्यातून व्यक्त होणारे भाव हे केवळ अप्रतिम आहेत. अनेक न लिहिलेले संवाद व प्रेक्षकांच्या मनात उमटत असलेले भाव ती केवळ डोळ्यांनी व्यक्त करते अन् त्यामुळे ती वेगळा ठसा उमटवून जाते.*

अमेय सईची अफलातून केमेस्ट्री म्हणजे गर्लफ्रेंड ! एखाद्या पिक्चर फ्रेम मधल्या मूळ ऑब्जेक्टवरील फोकस अधिक ठळक होईल याची काळजी त्याभोवतालच्या रंगसंगतीने येत असते तद्वत बाकी सगळ्या पात्रांच्या भुमिका मस्त जमून आल्या आहेत. गाणी अन् संगीत बद्दल मी म्हणेन "पसंद अपनी अपनी .. खयाल अपना अपना" !  पण प्रेक्षकांना ही गर्लफ्रेंड नक्की आवडेल. पिक्चरची लांबी १०-१२ मिनिटे कमी होऊ शकली असती व त्यामुळे काही क्षण पिक्चर रेंगाळतोय किंवा स्लो झालाय हा विचार मनात आला नसता.

बिंदूमाधव भुरे, पुणे.

Monday, July 22, 2019

क्या इतिहास दोहराएगा ?

क्या इतिहास दोहराएगा ?

आपको याद होगा कि किसी ज्यूनियर ऑफिसर को उसके ब्रँच मँनेजरने थप्पड मारनेवाला व्हिडियो सोशल मिडियापर व्हायरल हुवा था. उसे कितनी लाईक्स मिली इस बातका कोई महत्व नही है लेकिन कमेंट मे सैकडो लोगोने जो बाते लिखी उससे अंदाजा लगता है कि पूरे देशभरमे ऐसी घटनाए हर दिन कही ना कही होती होगी मगर भयके कारन उसे कोई अपनी जुबापर लाता नही होगा.

कमेंटमे यह भी पढ़ने मिला था कि ऐसे मामलोमे युनियन्स क्या करती है ? लेकिन ज्यादातर कमेंट मँनेजमेंट को गालीया देते हुए अपना गुस्सा व्यक्त करनेवाले थे.

मित्रो, मँनेजमेंटका यह रवैया रुकनेका नाम नही ले रहा है बल्कि दिनबदिन ऐसी घटनाए बढ़ रही है. गत सप्ताह एक ऑडियो क्लिप व्हायरल हुई. पुणेकी किसी महिला शाखाप्रमुख और पुणे क्षेत्रके डीजीएम के बीच फोन पर बात हुई और डीजीएमने बात करते समय उसे धमकाया तथा असभ्य भाषाका प्रयोग किया. "आपको शर्म नही आती ... आपका औरंगाबाद रुरलमे ट्रान्स्फर कर दूंगा" वगैरा वगैरा ....

इसी तरहकी और एक क्लिप सुनी जिसमे एक ऑफिसर जो कि अस्पतालमे अँडमिट है उसे एजीएम ड्यूटी जॉइन करनेके लिए सख्ती कर रहा है. अधिकारी उसकी मजबूरी बयान कर रहा है लेकिन एजीएम सुनना नही चाहते और गुस्सेमे कहते है कि रिझाईन करो. मित्रो, अपने घरमे नौकर, नौकरानीसे बात करते समय हम सभ्यताकी सीमाका पालन करते है. तो क्या बँकोमे काम करनेवाले अधिकारी, शाखाप्रमुख इन नोकर नौकरानीयोंसे गैरगुजरे है ? कभी राहूल द्रविडने हमारे बँकलिए कहा था "मेरा बँक बदल रहा है" लेकिन ऐसा बदलाव किसीने सपनोमेभी नही सोचा होगा.

मित्रो, १९५० के दशकमे बँकोमे ऐसेही जुल्मका दौर चल रहा था. जिसपर जुल्म, अन्याय होता था वह उसे सहता था क्यो कि अन्य लोग चूप्पी साधे बैठते थे, लड़नेकेलिए कोई आगे नही आता था. जब यह अन्याय, जुल्म अपने चरमसीमापर पहूचे तब लोगोने संगठित होकर प्रतिकार करना आरंभ किया. १९७० के बाद युनियनके संगठन एक ताकदवर शक्तीके रुपमे उभरने लगे. लेकिन इस संगठित शक्तीका पतन १९९९-२००० के बाद होना आरंभ हुवा और २०१० के बाद तो यह अस्तित्वहीन लगने लगे.

युधविराम कालमे अपने अस्त्र और शस्त्रोंको यदि उपयोगमे नही लाया तो वह किसी कामके नही रहते. ऐसी स्थितिमे जब शत्रू प्रहार करता है तो संख्याबल एवम संगठित शक्ती होनेके बावजूद भी हारका सामना करना पडता है. आज हमारी सारी युनियन्स युएफबीयू के झंडेतले एक है, संख्याबल भी भारी है लेकिन हम लड़ना भूल गये है. आंदोलन, धरना, कोर्टकेसेस इनके साथ साथ आजके टेक्नॉलॉजीके युगमे हम सीधे महिला आयोग, अर्थमंत्रालय, पीएमओ जैसे विभागोको अपनी शिकायत इमेलद्वारा भेज सकते है. आपसी संपर्कके आधुनिक साधन सुविधा हातमे होनेके कारण आप और अच्छी तरहसे संगठित हो सकते हो.

संगठनोंको फिरसे सक्रिय बनना होगा और इसमे युवा पिढीके बैंक कर्मियोंको आगे आना होगा. इतिहासके पन्ने फिरसे दोहराएंगे. अन्याय और जुल्म अपनी चरमसीमा छूने की राह क्यो देखे ? संगठन और उनकी ताकद अस्तित्वहीन हुई है ... मँनेजमेंटकी इस गलतफहमीको दूर करना होगा. साधूने सापको दिया हुवा संदेश याद रखे "फुत्कारो लेकिन काटो मत"! बैंकका कोई नुकसान न हो लेकिन मँनेजमेंटके गलत तत्व जड़से खत्म हो इसका ध्यान रहे. अगर कूछ नुकसान होता है तो उसे दुरुस्त करनेवाले हम अधिकारी-कर्मचारी है. लेकिन गलत बर्ताव करनेवाली मँनेजमेंटका रवैया ऐसाही चलता रहा तो बैंकके अस्तित्वपर प्रश्नचिन्ह लगेगा.

इसलिए लड़ते समय यह बात ध्यानमे रहे कि हम देशहितमे लड़ रहे है. देशहित सर्वोच्च है बादमे उद्योगहित आता है और हमारा अस्तित्व और हित इन्ही दो तत्वोके साथ जूडा है. "मै .. मेरा" इस दृष्टिकोनको त्यागकर "हम ... हमारा" यह सोचही बॉबकल्चर को, हमारी अलग कार्यसंस्कृतीको बचाएगी और बैंक कै सदा प्रगतीपर ले जाएगी.

बिंदूमाधव भुरे, पुणे
bnbhure@rediffmail.com

Tuesday, July 16, 2019

मुद्दल


"मुद्दल"

दिगंबर उर्फ दिग्या .. उभ आयुष्य बँकेत डेबिट क्रेडिट करण्यात गेल. तो एक काळ होता  ... इयर एंड आल कि डिपॉझिट आणण्यासाठी भटकंती करावी लागायची विनवण्या कराव्या लागायच्या. वर्षातून एकदा "बचत सप्ताह", "डिपॉझिट मोबिलायझेशन विक" किंवा "बचत पंधरवडा" यासारखे उपक्रम बँक साजरे करायची. या कालावधीत खाते उघडणाऱ्या खातेदारास कि-चेन, एखाद पेन वगैरे भेट दिल जायच. 


तेव्हा डिपॉझिट वर मिळणारे व्याजाचे दर तेरा / चौदा टक्के म्हणजे अगदी मुद्दलाचाही विसर पडावा इतके आकर्षक होते त्यामुळे मिळणाऱ्या "व्याजाला किंमत" होती आणि म्हणूनच आयुष्यात "व्याजाला महत्व" होते. पासबुक मधल्या नोंदीप्रमाणे घरी व्याजाचा हिशोब करणारा व बँकेने दीड रुपया व्याज कमी दिलय म्हणून भांडणारा ग्राहक दिग्याला आजही लक्षात होता कारण त्याने दिग्याला बँकेत काय झोपा काढायला येता का ?” असे सुनावले होते. पूर्ण सर्विसमध्ये असे अनेक नमुने दिग्याला भेटले होते.


काळ धावत होता, परिस्थिती बदलत होती अन बँकिंगही ! वैयक्तिक आयुष्यात जितके चढ-उतार पाहिले नसतील तितके चढ-उतार व्याज दरात झाल्याच त्याने गेल्या काही वर्षात पाहिले होते. व्याज दर कमी झाले कि चिंतातूर ग्राहक डिपॉझिट काढून दुसऱ्या बँकेत जाणार. दिग्याने त्यांना प्रश्न केला कि तिकडे व्याज दर अर्धा टक्का जास्त आहे हे हमखास ठरलेले उत्तर कानावर पडायच. बऱ्याचशा सहकारी बँकात व्याज दर जास्त मिळत असे पण कराड बँकेसारख एखाद प्रकरण घडायचं अन मग अर्धा टक्का व्याजाच्या मोहापायी गेलेल्या ग्राहकांचे मुद्दलच परत मिळायचे वांदे व्हायचे. 


थोड्या जास्त व्याजासाठी वेगवेगळ्या बँकांचे उंबरठे झिजवणाऱ्या ग्राहकांना समजावतांना दिग्या त्यांना सांगत असे भले आमच्याकडे व्याज कमी मिळत असेल पण मुदतीनंतर तुमचे मुद्दल परत मिळण्याची इथे खात्री आहे. ग्राहकही चिकित्सक ... त्यांचे प्रश्नावर प्रश्न सुरु असायचे. मग दिग्याच भन्नाट लॉजिक काम करुन जायच. अहो, आर्थिक अडचणीत सापडलेला माणूस जास्त व्याज द्यायला तयार असतो ना ? मग बँकाचही तसच आहे समजा. जास्त व्याजाच्या मोहात पडून मुद्दल धोक्यात टाकू नका, इमरजंसीला, अडचणीच्या वेळी मुद्दल मोडून पैसे पटकन मिळायला हवेत ना ?” ही मात्रा बरोबर लागू पडायची.  फक्त व्याज अन् व्याजाचाच विचार करणाऱ्या मंडळींना मुद्दलाबाबदचा असा दृष्टिकोन दिग्यामुळे लक्षात यायचा व मुद्दलाचे महत्व समजायचे. 


ग्राहकांना सांगता सांगता कळत नकळत दिग्याच मनही "मुद्दल जपल पाहिजे, व्याज थोड कमी मिळाल तरी हरकत नाही" या मतावर ठाम होत गेले. आज रिटायर झाल्यावर फंडाचे व अन्य मिळालेली सगळी रक्कम त्याने बँकेत फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवून मुद्दल सुरक्षित केल होत. त्यावर मिळणारे व्याज व पेन्शन यात आपल भागल पाहिजे याकडे त्याचा कटाक्ष असे. शेयर्स अन् म्युचवल फंडाच्या भानगडीत तो कधी फारसा पडला नव्हता. 


सर्विसमध्ये असतांना संसारिक जबाबदाऱ्यांचे ओझे उरावर होत म्हणून बिचाऱ्याने ना कधी मुक्त हस्ते खर्च केला ना कुठली चैन. कुठेही वायफळ खर्च होणार नाही हे त्याने वेळोवेळी पाहिल होत आणि आजही तो कटाक्षाने ते पाळतो. पण आता वाढती महागाई, घसरणारे व्याजदर, तुटपुंजी पेन्शन यातच खर्च भागवण्याची कसरत करणे त्याला दिवसेंदिवस अवघड जात होते. वयोमानानुसार दवाखाना, औषधे, क्लिनिकल टेस्ट तर कधी हॉस्पिटलायझेशन यांचा खर्च आता यादीत डोकावत होता.


बँकेत कस्टमरशी संवाद साधतांना संयम ढळू न देता गोड बोलण्याच्या बदल्यात दिग्याला साखरेचा आजार ... मधुमेह मागे लागला होता. घरच्या आघाडीवर बायको वत्सला उर्फ वसू एकटीच. घर संभाळणे, मुलाचे बघणे अन् दिलेल्या बजेटमधे घरखर्च भागवणे. कायम हसरा चेहेरा ठेवून दुःख, तक्रार यांना कधीही मोकळी वाट करुन न देण्याच्या बदल्यात उच्च रक्तदाब ... हाय-बीपी तिच्या मागे लागल होत. मुलगा शिकण्यासाठी म्हणून यूएसला गेला अन् नंतर तिथेच जॉब लागला होता. वर्षा दोन वर्षातून एकदा भारतात यायचा ते ही कामासाठी. आला कि धावपळीत एखादा दिवस भेटून जायचा. दिग्या आणि वसूसाठी तो दिवस दिवाळीसारखा असायचा. त्यामुळे "उतारवयातली काठी" म्हणून त्याचेकडे त्यांनी कधीच पाहिल नाही. 


शांत झोप लागलेल्या वसूच्या चेहेऱ्याकडे दिग्या एकटक पहात होता. घरात चक्कर येण्याच निमित्त झाल. डॉक्टरने बीपी खूपच हाय झाल सांगितल आणि इसीजी पाहून अँडमिट करण्याचा सल्ला दिला होता. डॉक्टर येऊन पाहून गेले होते, सलाईन सुरु होत. दोन तीन कसल्याशा टेस्ट झाल्या कि रिपोर्ट पाहून नंतरची लाईन ऑफ ट्रीटमेंट ठरवू म्हणाले. "दिग्या, ए दिग्या" अनिलच्या हाकेने दिग्याची तंद्री भंगली. अनिल दिग्याचा बालमित्र आणि बँकेतला सहकारीही होता. ५० वर्षांची दोस्ती .. त्यामुळे अनिल म्हणजे टेंशन डाऊनलोड करुन मन मोकळ करण्याच दिग्याच हक्काच ठिकाण. आठवड्यातून एकदा तरी दोघेही एकमेकांना हमखास भेटायचे. आज वसूला अँडमिट करतांना दिग्याने पहिला फोन अनिललाच केला होता.


वसूला नुकतीच झोप लागली होती त्यामुळे दोघेही रुमच्या बाहेर बसले होते. दिग्या आज म्हणावा तसा मोकळा होत नाहीये हे अनिलच्या लक्षात आल होत. वसूच्या रिपोर्टमधे काय निघेल याच टेंशन असेल कि मुलाला लगेच कळवाव कि रिपोर्टची वाट बघेपर्यंत थांबाव ? अशी त्याची द्विधा मनःस्थिती झाली असेल. अनिल त्याच्या मनाचा अंदाज घेत होता. पैसा अनाठायी खर्च न करणे आणि हातचे राखून खर्च करण्याची सवय असलेल्या दिग्याला पैशाच टेंशन असायच काही कारण नव्हत हे त्याला ठाऊक होत अन् हॉस्पिटल बिलासाठी मेडिक्लेम होताच ! मग दिग्या त्याच मन मोकळ का करत नाहीये याच कोड अनिलला पडल होत. मुद्दलाची काळजी करण्याची सवय अंगी भिनलेल्या दिग्याच्या मनात काय सुरु असेल याचा अंदाज घेत अनिलने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. 


"दिग्या, तुझी थियरी बरोबर आहे. पण आयुष्यभर मुद्दल सुरक्षित ठेऊन व्याजावर जगणे शक्य नसते. लेका, आयुष्याच्या एका टप्प्यानंतर मुद्दलही खर्च करायच असत. जिना चढत चढत शेवटच्या पायरीवर आल्यानंतर काय ? तर एक एक पाऊल पुनः उतरायच असते. सेवानिवृत्तिच्या दिवशी या पायऱ्या उतरायला आपण सुरुवात केली आहे." दिग्या थोडा संभ्रमात पडला होता. त्याला मधेच थांबवत तो म्हणाला, " मला बँकेत केलेल्या एफडी मोडायला लागणार, माझ मुद्दल ...... असल काही तू समजत असशील तर ते साफ चूक आहे रे ! अन्या, अरे वेळ पडली तर आख्खा बँक अकाऊंट रिकामा करेन. पण वसू मला हवी आहे." दिग्याचा स्वर हळवा झाला होता.


अनिल मंद हसला, "दिग्या लेका, मी त्या मुद्दलाबद्द्ल नाही बोलत आहे. आर्थिक प्रॉब्लेम्स कशामुळेही येऊ शकतात. अशा वेळी एफडीवर लोन घ्यायच किंवा ती मोडायची हे का आपल्याला ठाऊक नाही ? पण काळाच्या ओघात हळूहळू त्या मुद्दलाची व्हँल्यू कमी होऊ लागते. इन्फ्लेशनमुळे म्हणा किंवा आणखी कशामुळे ... एक दिवस ते असून नसल्यासारखे होते." दिग्याच्या चेहेऱ्यावर अजून प्रश्नचिन्ह तसेच होते. अनिल बोलत होता .. "दिग्या आपली वाटचाल सत्तरीकडे सुरु झाली आहे, केव्हातरी घंटी वाजणार. मग या मुद्दलाची किती काळजी करशील ? तेही खर्च होत रहाणार अन् एक दिवस संपणार .. बँलन्सशीट मधे डेप्रिसिएशन नावाचा आयटेम असतो ना ? तो आणि इन्फ्लेशन हे दोन्ही फँक्टर्स आपल्यालाही लागू होतात समज. हे जीवनाच वास्तव आहे दिग्या ! हे वास्तव स्वीकारलस तर तुझ सगळ टेंशन संपून जाईल." दिग्यासमोर आज मुद्दलाची वेगळीच बाजू प्रकाशात आली होती. 


डॉक्टर राऊंडवर येतांना दिसले तसे दिग्या ऊठला. "काळजी करु नकोस, सगळ काही ठीक होईल. काही लागल तर सांग .... येतो मी" म्हणून अनिल निघाला. दिग्याच्या मनाची घालमेल थांबली होती, डोक्यातल विचारांचे वादळही निवल होत. मुद्दल शब्दाची वेगळी व्याख्या, वेगळा अर्थ सांगून जाणारा अनिल त्याक्षणी त्याला डॉक्टरांच्या इतकाच देवदूत वाटत होता.


© बिंदूमाधव भुरे, पुणे.
९४२४००७७६१ / ८६९८७४९९९०

Thursday, July 4, 2019

माझा वारीतला एक दिवस

*माझा वारीतला एक दिवस*

माउलींच्या पालखीचे आगमन पुण्यात झाले कि त्यांचा येथे एक दिवस मुक्काम ठरलेला. आगमनाचे दिवशी रात्री किंवा दुसरे दिवशी केव्हातरी पादुकांच्या दर्शनासाठी वडील मंडळी आम्हाला नेत असत. नंतर एक दोन वेळा फर्गसन कॉलेज रस्त्यावर गर्दीत दर्शन घेतल्याचे आठवतंय. त्यानंतर अनेक वर्ष बँक आटोपल्यावर घरी जातांना अनुभवलेला ट्राफिक जाम ! २०१७ साली माझा निवृत्त सहकारी प्रकाश बँकेत आला आणि सहजच वारीचा विषय निघाला तेव्हा माझ्या डोळ्यासमोर ही सगळी दृश्य तरळली आणि क्षणाचाही विलंब न करता मी त्याला म्हणून गेलो “यावर्षी मीही येणार !" त्यानेही आठवणीने वारीच्या पहिल्या मिटींगला मला बोलावले. वारीला जाण्याचा माझा जबरदस्त योग असावा कारण त्या मिटींगला जाण्याची बुद्धी मला झाली.

 

*वारीचे प्रचंड कुतूहल अनेक वर्षांपासून होत.* काही लाख वारकरी २०-२१ दिवस घरदार सोडून पंढरीच्या दिशेने पायी कसे जात असतील ? सतत २०-२१ दिवस पायी चालून त्यांना काही त्रास होत असेल का ? विठू माऊलीच्या दर्शनाची ओढ म्हणजे नेमक काय ? आषाढीला पंढरपुरला जमणाऱ्या ८-१० लाख भाविकांपैकी प्रत्यक्ष मंदिरात जाऊन विठ्ठल रखुमाईचे दर्शन किती लोक घेत असतील ? वगैरे ... यासारख्या *अनेक प्रश्नांची उत्तरे मला वारीत मिळणार होती.* कोपऱ्यावरच्या किराणा दुकानातून काही सामान आणायचे झाले तर लहानपणी मला सायकल लागायची आता स्कूटर लागते. पण"पायी जा" असे सांगितले कि "वेळ वाचतो" हे माझे उत्तर ठरलेले. त्यामुळे *वारीबाबद सर्वाधिक कुतूहल होत ते सतत २०-२१ दिवस पायी चालणाऱ्या वारकऱ्यांचे आणि त्यांच्या दैनंदिनीचे !*

शिवाजीनगर ब्रँचला असतांना एकदा बँकेतून निघायला खूप उशीर होऊन गेला होता. स्कूटर सुरु होईना म्हणून मागे गावठाणात असणारा आमचा नेहमीचा बाळू मेकँनिक फोन करताच धावत आला. काहीतरी मेजर प्रॉब्लेम होता. उद्याच होईल दुरुस्त म्हणाला आणि स्कूटर घेऊन गेला. मी धोपटी उचलली व रिक्षाने जाऊ अशा विचारात रस्त्यावर आलो अन् लक्षात आले कि पैशाचे पाकीट आज घरीच विसरल आहे. *खिशात दमडा नाही त्यामुळे आपसूक मानसिक बळ आल असाव आणि म्हणूनच “जाऊ चालत” असा विचार मनात आला* अन् जे एम रोड वर चालू लागलो. दत्तवाडीत घरी पोहोचेपर्यंत एक तास लागला. *खूप खूप चालायचा एव्हढाच काय तो अनुभव ! पण बॉबच्या अनुभवी वारकरी टीमने पुणे - सासवड हे २८ किमी अंतर भक्तिमय वातावरणात कसे सहज पार होते हे रंगवून सांगितले असल्यामुळे मनात कुठेही भीती नव्हती, किंबहुना उत्सुकताच होती.*

 

पसायदान पूर्ण पाठ नाही ना त्याचा अर्थ नीटसा ठाऊक, ज्ञानेश्वरीतली एक ओवी, एक अभंग येत नाही, लहानपणी कानावर पडलेला ग्यानबा तुकारामचा जयघोष, टाळ चिपळीचे स्वर आणि मृदुंगाचा ठेका केवळ या आठवणींच्या शिदोरीवर वारीच्या मार्गावर मार्गस्थ होणार होतो. १८-२० जण सोबत होते पण मन मात्र स्वत:शी बोलत होते, डोळे सभोवतालचे निरीक्षण करत होते. खातांना हातातल बिस्कीट खाली पडल तर मुलांना ते धुळीत पडल्याने घाण झाले असे म्हणणारे आपण ... पण वारीच्या वाटेवर पहिले पाऊल टाकतांना त्याच *रस्त्याला वाकून नमन करायच आणि तिथली धूळ मस्तकी लावायची हा निरिक्षणातून मिळालेला पहिला धडा !*

माऊलींची पालखी या रस्त्याने जाणार म्हणून किंवा गेली म्हणून पवित्र झालेला हा रस्ता ही त्यामागील वारकऱ्यांची भावना असावी ! इतकी पवित्र भावना बाळगण्या इतका मोठा भाविक मी नक्कीच नव्हतो. त्यामुळे ज्या मार्गावर लक्षावधी श्रद्धाळू, भाविक, वारकरी यांच्या पाऊलखूणा उमटतात त्या पवित्र पाऊखुणांना आपला पदस्पर्श व्हावा व वारी केल्याचे आभासी पुण्य पदरात पडावे या नुसत्या विचारानेच *मनाच्या अडगळीत पडलेल्या भक्ती भावनेवर साचलेली धुळ क्षणात दूर झाली आणि माऊली म्हणून कोणीतरी आपल्याला हाक मारताच अंतर्मनात श्रद्धेचा भाव जागृत झाल्याची प्रचिती आली.*

मनात येणाऱ्या विचारांना थोपवण्याचे काही कारण नव्हते, त्यांचा मुक्त संचार मनात अनेक प्रश्नांचे तरंग उमटवत होता. *या प्रश्नांची उत्तरे शोधण्यास बुद्धी तोकडी पडावी कारण त्यांची उत्तरे "श्रद्धा" या एकाच शब्दात येतात.* शरीराला एखादा रोग झाला कि डॉक्टर सांगतात "इंफेक्शन" झालय किंवा "व्हायरल" आहे आणि मग "अँटिबायोटिक"चा एक डोस देतात. आयुर्वेदात शरीरशुद्धीसाठी पंचकर्माला महत्व ! दोष निर्मूलनासाठी वर्षातून एकदा पंचकर्म कराव. पण अनेक विचारांनी आणि विकारांनी ग्रस्त असलेल्या *मनाचे "इंफेक्शन" किंवा मनाचे "दोष निर्मूलन" केवळ आणि केवळ वारीतच होते. ही विठूमाऊलीच्या नामोच्चाराची किमया म्हणावी कि भक्तिमय, मंगलमय वातावरणाने भारलेल्या वातावरणाचा परिणाम ?*

कधी नापिकी तर कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी तर कधी बाजारभाव नाही यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणे हे चित्र नित्याचेच ! पण घर कोसळू द्यायच नाही, सगळ दुःख मनात ठेवायच आणि संसाराचा गाडा हाकायचा हे कसब त्या त्या घरच्या माऊलींना साधावच लागत. अनवाणी पायाने वारीच्या गर्दीत वाट चालतांना तळपायांना बसणारे चटके, होणाऱ्या वेदना तर कधी पावसामुळे झालेला चिखल याची पर्वा न करता डोईवरच तुळशी वृंदावन लिलया संभाळण्याची कसरत करणाऱ्या माऊली पाहिल्या कि फाटलेल्या संसाराला ठिगळ लावून प्रपंच संभाळण्याच त्यांचे हे कौशल्य उपजत आहे कि  विठूमाऊलीचे नाम घेत केलेल्या वारीमुळे साधल गेलय ? याचे उत्तर वारीत मिळत. *एक बँकर म्हणून लेजर बँकिंगच्या काळातील "बँलंसिंग" शब्दाचा नवा अर्थ वारीत कळत होता.*

वारीचे माझे हे तिसरे वर्ष ! सुसंस्कृत व बुद्धिजीवी म्हणविणाऱ्या वर्गात मागच्या पिढीतली परंपरा पुढची पिढी संभाळतांना अभावानेच दिसते मग वारीची परंपरा पिढ्यान पिढ्या कशी संभाळली जात असेल ? या प्रश्नाचे उत्तर पुढच्या वर्षीच्या वारीत सापडेल कदाचित ! उच्च शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या बाजारात जेव्हा आजची तरुण पिढी प्रवेश करते तेव्हा त्यांच्या वयाची पंचविशी (नविन गणिताप्रमाणे - वीस पाच) उलटलेली असते. तर वयाच्या २१ व्या वर्षी अवतार कार्य संपले म्हणून समाधिस्थ होणारे ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीतील रचनांचा अर्थ अजूनही लावला जातोय. पुढच्या वर्षीपर्यंत एका तरी ओवीचा अर्थ समजावून घ्यावा हा विचार पुण्यात परतत असतांना मनात दृढ झाला होता आणि वारीचे आयोजन नियोजन करणाऱ्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांबद्दल मनोमन कृतज्ञतेचा भावही !

बिंदूमाधव भुरे, पुणे
९४२३००७७६१
८६९८७४९९९०