Wednesday, April 26, 2017

मी कोण ?

एकट असतांनाच्या स्थितीत मनात नेहमी निर्माण होणारा एक प्रश्न !

"मी कोण आहे ?"

लोकोपयोगी समाजसेवक कि समाजसेवेच्या बुरख्याआड दडलेला एक भ्रष्टाचारी ?

यंत्र चालविणारा एक कामगार कि माणुसकी विसरुन यंत्रवत झालेल्या या समाजाचा एक घटक ?

रात्री पोटाच खळग भरण्यासाठी दिवसभर राबणारा मजूर कि मजूरांची पिळवणूक करणारा एक निर्दयी मालक ?

प्रत्येकाला खायला मिळाव म्हणुन शेत फुलविणारा शेतकरी कि त्याच मालाला कवडीमोल भाव देणारा बाजारातील दलाल ?

संकटे येऊ नयेत म्हणुन किंवा संकटाशी लढण्याच आत्मबल मिळाव म्हणुन देवाची करुणा भाकणारा भाविक कि पुजाऱ्याच वस्त्र धारण करुन त्यांच्या देवभोळेपणाचा आणि श्रद्धेचा गैरफायदा घेणारा एक धार्मिक दलाल ?

नविन पिढी घडविणारा एक व्रतस्थ शिक्षक कि शिक्षणाचा बाजार मांडलेला एक कमिशन एजंट ?

प्राणाहून प्रिय अशा मातृभूमिचे संरक्षणासाठी जीवावर उदार होऊन लढणारा सैनिक कि अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या नावाखाली आजादीच्या घोषणा देणारा एक देशद्रोही ?

मानवतेच्या कल्याणासाठी या ब्रम्हांडाच रहस्य उलगडण्यात मग्न असलेला एक शास्त्रज्ञ कि याच शोधांचा विनाशकारी उपयोग करणारा एक माथेफिरु, विकृत आतंकवादी ?

आपसी प्रेम व सद्भावना यांची शिकवण देणारा संत-महंत कि जाती-धर्माच्या भिंती मजबूत करण्यासाठी विखारी संदेश देणारा धर्मगुरु ?

समाजाची बौद्धिक भूक भागविण्यासाठी विपुल ग्रंथसंपदा निर्माण करणारा साहित्यिक कि त्या साहित्यावर मनापासून प्रेम करणारा एक वाचक ?

विक्रेता कि ग्राहक, संयोजक कि खेळाडू , शिक्षक कि विद्यार्थी ? वगैरे वगैरे .....

मी नेमका कोण आहे ? विविध स्तर असणाऱ्या या सामाजिक रचनेत माझ नेमक स्थान काय आहे ? चारचौघांसारखे विवंचनेत जीवन जगणारा मी जेव्हा या प्रश्नाच उत्तर शोधण्यासाठी अवती भवती नजर टाकतो तेव्हा मला माझ अस्तित्व अशा अनेक स्तरात असल्याच दिसून येत.

काही वेळा असही वाटत कि मी एक रंगकर्मी आहे, कलाकार आहे. लेखकाची संहिता आणि दिग्दर्शकाचे निर्देश यानुसार मी त्याने "दिलेल्या भूमिकेत" रंग भरण्याच काम करतो आहे. लोकांना माझे काम आवडल तर मग प्रयोग सुरुच रहातात. पण कारण काहीही असेल, केव्हा तरी कायमचा पडदा पडून प्रयोग, खेळ कायमचा बंद होणार हे नशिबी असतेच.

तस बघितल तर जन्माला आल्यानंतर विद्यार्थी, मुलगा/मुलगी, पती/पत्नी, आई/बाबा, मालक/नोकर, कर्मचारी, व्यावसायिक, विक्रेता वगैरे अशा वेगवेगळ्या भूमिकाच तर आपण वठवत असतो. रोजच रंगीत तालीम अन् रोजच प्रयोग. रोज नव्याने उद्भवणारी आव्हाने व प्रसंग लक्षात घेऊन अभिनयात नविन रंग भरत रहायच, ऐन वेळच्या जागा सुचतील त्या घेत अभिनय खुलवत रहायच आणि एक दिवस एक्झिट घ्यायची कि पडदा आपोआप पडतो.

कल्पनेतला हा रंगकर्मी रंगवतांना एक क्षणभर "आनंद" मधील शेवटच दृष्य डोळ्यापुढे उभ रहात ! राजेश खन्ना सांगतोय बाबू मोशायला "हम सब तो रंगमंचकी कठपुतलियां है !" खरच आहे ते ! तो नाचवेल तस नाचायच अन् त्याने दोरी ओढून घेतली कि खेळ खलास !

त्याच्या इच्छेनुसार मी या ग्रहावर भ्रमण करण्यासाठी पाठविलेला एक प्रवासी तर नाही ना ? हल्ली पानभर जाहिरात नाही का वाचत आपण "चलो, बॅग भरो, निकल पडो"! या जाहिरातीतली प्रवास कंपनी तुम्हाला फिरवून आणते. ही टूर कधी ७ तर कधी १४ तर कधी २१ दिवसांची असते. टूर संपली कि आपण "घरी परत !"

तस माझ्या कल्पनेत या पृथ्वीतलावर मी पर्यटनासाठी आलेला (कि पाठविलेला) एक प्रवासीच आहे. ही टूर ४० वर्षांची आहे कि ६० कि ८० ? हे कोणालाच माहिती नसत इतकाच काय तो फरक. इथला कार्यभाग आटोपला कि "घरी परत !" परतीच तिकिट मात्र नक्की असत.

प्रत्येकाने "मी कोण" याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न मात्र नक्की करावा. आपण सगळेच रंगकर्मी असल्यामुळे आपला रोल कसा चांगला होईल व तो सगळ्यांना कसा आवडेल याकडे लक्ष द्यावे. पडदा पडल्यावर लोकांनी नाव ठेवू नये याची काळजी सदैव घ्यावी. तसेच मी येथे एक प्रवासी, टूरिस्ट आहे असे मानून हा प्रवास आपल्याबरोबरच इतर सहप्रवाशांनाही आनंद देणारा राहील याचा आपल्या परीने प्रयत्न करत रहावा !

अगदी "मी कोण" या प्रश्नाच उत्तर (सुरवातीला उल्लेखिलेल्यापैकी) काहीही असल तरी !

बिंदुमाधव भुरे, पुणे.

Thursday, April 13, 2017

Incremental Growth Issue.

Unscientific construction of the "amount of increment" in BPS

       **Incremental Growth Issue**

During the 10th BPS, it has been observed that though it was agreed to give rise of 15% on pay slip, the percentage of rise was differing from stage to stage. 

If we look at the percentage of arrears, we can observe that the percentage of growth on & average up to 20th stage was around 14% or less & then it was around 15%

The main reason behind this variation was "unscientific construction of the amount of increment" at all stages. This anomaly has been continuing since last so many settlements & has remained un-rectified due to the clause of "stage to stage fitment" incorporated in each BPS.

Let’s have a look at the stages of increment of 10th BPS for Award Staff to explain the concept in detail.

The basic pay & increment structure for Award Staff at 10th BPS was as under;

7200 – (400/3) – 8400 – (500/3) – 9900 – (600/4) – 12300 – (700/7) - 17200 – (1300/1) – 18500 – (800/1) - 19300 (20years)

From the above pattern we will find that

*Increment for Rs.400/- is for 3 years then the

*Increment for Rs. 500/- is for 3 years then the

*Increment for Rs.600/- is for 4 years then the

*Increment for Rs.700/- is for 7 years then the

*Increment for Rs.1300/- is for 1 year (hump increment) & lastly the

*Increment for Rs.800/- is for 1 year & the same is continued for further stagnation increments.

· After getting the increment of Rs.400/- for continuous 3 years,  4th increment is for Rs.500/-

· It means after first 3 years, the growth in the amount of increment is Rs.100/- ( 500 less 400 = 100 i.e. 25% on Rs.400/-)

· After getting the increment of Rs.500/- per year for further 3 years the rise in the next increment is again for Rs.100/- & it is for Rs. 600/-

·This growth percentage is 20% ( 600 less 500 = 100 on Rs.500/-) which is not logical & hence it’s unscientific.

The growth percentage should be progressive & not regressive. When we consider the “Incremental Growth”, if at first stage it is 25%, it has to be maintained or increased in next all “Increment Growth Stages”.

If the “Incremental Growth” rate is considered as 25% minimum & has to be progressive further, then the stage wise amount of increments should have been as under:

· Increment for Rs.400/- is for 3 years
· then @25% growth rate (on Rs.400/-) it is Increment for Rs. 500/- is for 3 years

· then @25% growth rate (on Rs.500/-) it should have been Increment for Rs.625/- is for 4 years

· then @30% growth rate (after 10 stages 5% rise) it should have been Increment for Rs.825/- is for 7 years ( rounded up )

· then @30% growth rate it should have been Increment for Rs.1075/- is for 1 year ( no hump increment) & lastly

· then @30% growth rate it should have been Increment for Rs.1400/- is for 1 year & the same is continued for further stagnation increments.

Thus, in 10th BPS the total of amount of increments spread in total 20 stages is

400*3 + 500*3 + 600*4 + 700*7 + 1300*1 + 800*1 = 12,100

As per the logical & scientifically constructed amounts of increments explained above, it would have been as under:

400*3 + 500*3 + 625*4 + 825*7 + 1075*1 + 1400*1 = 13,550

Even after removing the "hump increment" which is of Rs.1300/- the net amount of total of increments spread over 20 stages became more by Rs. 1450/- ( Rs.13,550 LESS Rs. 12,100/-) &

Stagnation increments would also have been more by Rs. 600/-  This is the result of removing the anomaly. (& logical, scientific construction of increment stages.)

Let's hope this important issue is highlighted in the forthcoming BPS negotiations. I have worked on this issue & submitted detail note through my organization to NOBW for onward doing needful. What about you ?

Bindumadhav Bhure
Joint Secretary
All India BOB Emp Union.
Affiliated to NOBW & BMS

Sunday, April 2, 2017

काउंट डाउन बिगिन्स !

काउंट डाउन बिगिन्स !

अमुक वेळेला कार्यक्रम करायचा अस ठरल कि मग तो कार्यक्रम सुरु होण्याआधी घडाळ्याची उलटी गिनती सुरु होते.

एखादी धावण्याची शर्यत, रेस सुरु होण्यापूर्वी स्टाॅप वाॅचचे काउंट डाउन सुरु होते.

खुप जाहिरातबाजी करुन झाल्यावर एखादी नविन मालिका सुरु होण्यापूर्वी टीव्हीच्या  चॅनलवर डाव्या कोपऱ्यात घड्याळाची उलटी गिनती सुरु झालेली दिसते.

अशा काउंट डाउनचा कालावधी पाच मिनिटापासून ते चोवीस तासांपर्यंतचा असतो.

१० वी १२ परिक्षेच्या बाबतीत तर हा काउंट डाउन महिना ते तीन महिने आधी सुरु होतो.

घरात मुला़च किंवा मुलीच लग्न ठरल कि "आल कि महिन्यावर लग्न" अस म्हणत काउंट डाउन सुरु होतो.

या विविध प्रकारच्या काउंट डाउनमधे एक प्रकारचे मानसिक दडपण, टेंशन, धडधड, उत्सुकता, आनंद अशा वेगवेगळ्या भावना प्रसंगानुरुप दाटून येत असतात.

पण एक काउंट डाउन असेही आहे कि ज्यामधे आनंद आहे, परिपूर्णता आहे, समाधान, मानसिक शांतता आहे आणि त्याचबरोबरीने  यासगळ्याला कुठेतरी विरक्तिपोटी आलेली दुःखाच्या भावनेची किनारही आहे.

हे काउंट डाउन असते सेवा निवृत्तीचे ! ३०-३५ हून अधिक वर्षे म्हणजे अर्ध्याहून जास्त आयुष्य माणूस नोकरीच्या ठिकाणी असतो. या सेवाकालावधीत कळत नकळत या संस्थेशी इथल्या सहकाऱ्यांशी त्याच एक भावनिक नात तयार होत जात. या नात्यातल प्रेम, भावनिक ओलावा त्याला  सेवाकाळात जाणवत नाही, कळूनही येत नाही.

पण हे काउंट डाउन जस सुरु होते तस मानसिक संतुलनाचा प्रवाह चंचलतेकडे नकळत सुरु होतो. नव्या जाणीवा मनात प्रवेश करु लागतात अन् वाटू लागत कि या नोकरीच्या ठिकाणी आपण किती समरसून गेलो होतो. एक दिवस आपण येथे परके होणार, उपरे होणार ! आता हे सगळे सोडून जायचय ते सुद्धा एका रात्रीतून.

शेवटच्या दिवशी संस्थेची चौकट ओलांडून बाहेर पडायच. मागे आपल्या पाउलखुणा ठेवून व सोबत अनंत आठवणी घेउन ! पण उगाच मागे वळून पहायच नाही कि कोणी चालतय का आपल्या पाउलखुणांवरुन ! कारण  "माजी" नावाची एक उपाधी आपली इच्छा असो नसो, आपल्याला येउन चिकटते अन् नविन पिढी ... तिने का बर चालाव आपल्याच पाउलखुणांवरुन ? आपणही स्वीकारुया कि त्यांची वेगळी वाट, वेगळी पद्धती !

३०-३५ वर्ष असलेल, जोपासलेल नात्याच लेबल एका रात्रीत बदलत अन् आपण "माजी" होतो, पण भावनांच काय ? त्याची दृढता विरळ व्हायला, ती वीण सैल व्हायला वेळ लागतोच ... नव्हे तो प्रयत्नपूर्वक द्यावाच लागतो. यालाच "इमोशनल डिस्कनेक्ट" अस म्हणाव का ?

"निवृत्तिपूर्व रजा" अनेक मंडळी घेतात, पाहणाऱ्याला वाटत कि रजा संपवतोय. पण खरच अस असत ? संस्थेशी "भावनिक नात" आपणच जोडतो आणि त्या नात्यापासून दूर जातांना मन कठोर करुन हे नात आता "व्यावहारिक पातळीवर" आणण्याच कामही आपल्यालाच करायच असत. "निवृत्तिपूर्व रजा" हा काळ मग अशा "इमोशनल डिसकनेक्ट" साठी वापरता येतो व वापरला जातो.

आयुष्यातल मनाला चटका लावणार अस हे  काउंट डाउन ! या काउंट डाउनला प्रत्येकाला सामोरे जावच लागत. माझही तेच सुरु आहे, शेवटचे २८ दिवस आणि मग ३० एप्रिलला .. मीही चेहेरा हसरा ठेवत म्हणेन बाय बाय "बँक आॅफ बरोडा !"

या बँकेमुळेच आज मी आहे अन्यथा माझ्या आयुष्यातून "बँकेच नाव" वजा केल तर काय उरणार ? एक मोठ्ठ शून्यच ना ?

बिंदुमाधव भुरे
बँक आॅफ बरोड़ा
पौड रोड, पुणे

Saturday, April 1, 2017

EVM vs Ballet Paper

*EVM vs Ballet Paper*

EVM मशिन जब प्रिंटरसे जोडा तब बटन कोई भी दबे कमल की पर्ची छपी, यह घटना आज मध्य प्रदेश मे चुनाव अधिकारी सामने घटी. तुरंत सभी लोगोने इसे EVM घोटाला करार दिया. सबसे आगे थे केजरीवालजी. उन्होने तो मांग करली कि चुनाव बैलेट पेपर सेही कराया जाय.

कोई यह मुद्दा नही उठा रहा है कि कमल चिन्ह का बटन जो कि पहले दबाया था, बटन दबते ही वह चिन्ह प्रिंटरसे कनेक्ट हुआ. लेकिन बादमें अन्य कोई भी चिन्ह दबाने के बाद कमल काही प्रिंट निकल रहा था. *मतलब पहले बटन दबानेपर जब EVM जिस चिन्हको प्रिंटरसे कनेक्ट हुआ वह डिस्कनेक्ट हुआ ही नही. इसलिए बटन कोइभी दबे प्रिंट वही, कमलका ही निकल रहा था जो कि पहला दबाया हुआ चिन्ह था.*

*क्या पहला दबाया बटन हाथ या झाडू चिन्ह का दबता तब भी कमल चिन्ह का प्रिंट निकलता ?*

*अब बैलट पेपर के बारेमें -*

इसमें तो गडबडी इतनी आसान है देखिए. समझो *बैलट पेपर गुलाबी रंग का है*. उसी आकारका एक कागज़ फोल्ड करके अंदर ले जाना है. बस्स, हो गया काम !  बैलट पेपर मिलनेपर जब वोटर मतदान कक्षमे उस पेपर पर चिन्ह के सामने मुहर लगाने लिए जाता है *तब जेबमेसे नकली पर्चा निकालकर असली पर्ची बगैर मुहर लगाए जेबने रखना है. बैलट बाॅक्समे नकली गुलाबी कागज अधिकारी के समक्ष डालकर असली पर्ची बाहर ले आना है.*

एक असली पर्ची बगैर मुहरवाली बाहर आनेके बाद  उसे मुहर लगाकर वोटर को दिया जाता है और उसके बदले उसने बगैर मुहरवालीे नयी पर्ची बाहर लानी है. *इस तरह एक पेपर बैलेट के रंगके कागज के बदले चाहे जितने वोट (पैसेके लेनदेनसे) मॅनेज करते हुए नकली वोटिंग आसान हो सकती है.*

तो अब आपही सोचिये बैलेट पेपरसे वोटिंगकी मांग क्यो हो रही है ?

बिंदुमाधव भुरे