Wednesday, November 6, 2019

संजयचा अज्ञातवास आवश्यक !

*संजयचा अज्ञातवास आवश्यक*

सामान्य जनतेला न दिसणारा महाभारताचा *सामना संजय* पाहू शकत होता व त्याचे सविस्तर वर्णन तो धृतराष्ट्राला करत होता. कानावर पडणारे वर्णन ऐकून दुःखी व कष्टी होणे इतकेच धृतराष्ट्राच्या हाती होते. आत्यंतिक उद्वेगाने तो मनातील खदखद व्यक्त करतांना संजयला "हे अस का" असे विचारायचा पण *संजयने कधीच कौरव कसे चुकले किवा पांडवांची बाजू कशी बरोबर यावर भाष्य केल नाही.* जणू रणांगणात घडणाऱ्या सामन्यांचे *फक्त वर्णन करण्याऱ्या पत्रकाराच्या* भूमिकेत तो होता. 

कौरव पांडव यात *"ठरल्याप्रमाणे घडाव"* पण ते न झाल्यामुळे महाभारत घडल. आजचा संजय दुहेरी (?) भुमिकेत अवतरला आहे. तो पत्रकारही आहे आणि एक सैनिकही ! वार्तांकनात न्यायाची बाजू घ्यावी कि सोईची ? बाजू मांडतांना मी *सैनिक कि पत्रकार ?* बाळासाहेबांचा शिष्य म्हणवून घ्यायचे तर ज्याची संख्या जास्त त्याचा मुख्यमंत्री या *तत्वाचा सोईस्कर विसर* का पडावा ? संजय उवाच वर पक्षप्रमुखांनी अवाक्षरही न उच्चारण्यामागे *पुत्रप्रेम कि पक्षभूमिका ?* 

आज प्रत्येकवेळी संजय उवाच होतात तेव्हा "ही पक्षप्रमुखांची भूमिका" असे ते आवर्जून सांगतात. महाभारतात डावपेचाचा भाग म्हणून युद्धात *शिखंडीला पुढे केल होत.* त्यामुळे काही वेळा पत्रकार व सैनिक असणारा संजय कधी *शिखंडी भासतो* पण बहुतांश वेळा *शकूनीच वाटतो* कारण हा पक्षप्रमुखांच नाव पुढे करुन स्वतःच फासे टाकतोय.

महाभारताचे युद्ध १३-१४ दिवस चालले होते अस म्हणतात. त्यात सत्याचा विजय झाला तरी दोन्ही बाजूंची प्रचंड हानी झाली होती. आज जनमानसात असलेल्या दोन्ही पक्षांच्या प्रतिमेची हानी होते आहे. *आजच्या भांडणात ना कोणी कौरव ना कोणी पांडव !* मतदान करतांना हे *दोघेही आपलेच अस मतदारांनी मानले*. भाजपला मिळालेल्या जागांचा आकडाही *१०५* आहे. काँग्रेसी विचारसरणी विरोधात लढतांना *आपण एक आहोत हेच जणू हा आकडा सांगतोय.* 

त्यामुळे आता कोणत्याही *कृष्णशिष्टाईची वाट न बघता दोघांनीही एक पाऊल माघार घ्यावी कारण यातच दोघांचाही विजय आहे.* घराच्या चौकटीबाहेर सल्ला देणारे अनेक *कळीचे नारद* टपून बसले आहेत. त्यांच्या जाळ्यात अडकू पहाणाऱ्या *संजयला आता काही काळ अज्ञातवासात धाडावे.* जनतेचा कौल आम्ही विरोधात बसाव अस दोन्ही काँग्रेस वारंवार सांगतायत याचाच अर्थ *जनतेचा कौल भाजप सेना या दोघांनी सत्ता एकत्रित स्थापन करावी हाच आहे* त्याचा झालेल्या दिरंगाईबद्दल माफी मागावी व आदर करावा. 

*© बिंदुमाधव भुरे, पुणे.*

No comments:

Post a Comment