Wednesday, October 25, 2017

खा राजू शेट्टी भाजप विरोधात प्रचार !

खा राजू शेट्टी गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप विरोधात प्रचार करणार ही बातमी माध्यमांसाठी ठळक बातमी किंवा ब्रेकिंग न्यूज बनली. खर तर आंदोलन करणे तुलनेन सोप असते कारण लोकक्षोभाला वाट करुन देणारा व आंदोलनकर्त्यांना प्रसिद्धि मिळवून देणारा तो एक सर्वमान्य मार्ग आहे. अर्थात, या मार्गाने आलेली सत्ता किंवा पद किती काळ टिकते याचा इतिहास तपासून पहावा लागेल.

शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे हे सगळ्यांनाच मान्य आहे. हा विषय शरद जोशींनी प्रथम प्रकाशझोतात आणला. आताची मंडळी हा विषय घेऊन शरद जोशींचाच आंदोलनाचा मार्ग चोखाळतात कारण हा मार्ग शेतमालाला भाव मिळवून देण्याची शक्यता असणारा असला तरी उपद्रवमूल्य मात्र नक्कीच मिळवून देतो.

अर्धा किंवा एक एकर शेती असणारा अल्पभूधारक व शेकडो एकर जमीन बाळगणारा संपन्न शेतकरी या दोघांच्याही शेती उत्पादन किंमतीत फरक असणार. मग हमीभाव निश्चित करतांना कोणाची किंमत आधारभूत मानायची ? हा कळीचा प्रश्न  सोडवावा लागणार आहे व त्याच्या उत्तरातून नविन प्रश्न निर्माण होणार नाही याचीही काळजी घ्यावी लागणार आहे. कारण उत्पादन खर्च जास्त असणारी रक्कम पायाभूत मानून जर हमीभाव नक्की केला तर ग्राहकांचे कंबरडे मोडणार व उत्पादन खर्च कमी धरुन किंमत निश्चित केल्यास अल्पभूधारक शेतकऱ्यांची घुसमट होणार !

त्यामुळे या सगळ्या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन तोडगा शोधण्याचे काम राज्यकर्त्यांना करावे लागणार आहे. आंदोलन कर्त्यांच्या मागण्यात या प्रश्नावर त्यांच्या लेखी असलेल्या तोडग्याचा उल्लेख त्यांनी स्पष्ट शब्दात करायला हवा किंबहुना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी "हा तोडगा" अशी एक स्पष्ट मागणी म्हणुन मांडावा व त्यासाठी आंदोलन करावे.

खा राजू शेट्टींनी गुजरातमधे जाऊन भाजपविरोधी प्रचार करेन ही केलेली दर्पोक्ती म्हणजे ज्या आंदोलनातून आपण पुढे आलो आहोत त्या आंदोलनाची व शेतकऱ्यांची फसवणूक नाही का ?

बिंदुमाधव भुरे, पुणे

No comments:

Post a Comment