Saturday, February 6, 2021

संस्मरणीय अकलूज

अकलूज ट्रीपचा विषय खरे तर श्री चव्हाण साहेबांनी लावून धरला होता आणि त्यातून या ट्रीपला सपत्नीक यावे हा त्यांचा आग्रह होता. एखादा निर्णय घेतला कि तो पूर्णत्वास कसा न्यायचा याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे श्री चव्हाण साहेबांनी *"ठरविली आणि प्रत्यक्षात आणली"* अशी ही *अकलूज ट्रीप !* अर्थात *श्री वाघोलेंचे निमंत्रण व जबरदस्त इच्छाशक्ती* यामागे एखाद्या चुंबकाप्रमाणे कार्यरत होती हे काय वेगळे सांगायला हव ? 

*"हमारे आदमी"* चारो तरफ फैले हुए है हा खास फिल्मी डायलॉग ! निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी *श्री प्रकाश जहागिरदार* हा असाच एक *"खास आदमी"* ! एक कुशल संघटक म्हणून अनेक गुण त्यांच्यात उपजत सामावले असल्याचे त्याने अनेकदा सिद्ध केले आहे. बस ठरविणे, कार्यक्रमाची रुपरेषा आखणे, माहितीचे आदानप्रदान यासाठी स्वतंत्र व्हाॅटस अप गृप करणे, त्यावर वेळोवेळी सूचना टाकणे, एकूण खर्चाचा अचूक अंदाज मांडणे, चोख हिशोब ठेवणे आणि "असू दे, राहू दे, नको नको" असे सांगूनही पैसे रिफंड करणे ... हे सगळे म्हणजे *प्रकाश के लिये बाये हाथका खेल !* 

या ट्रीप चे मला आणखी जाणवलेले वेगळेपण म्हणजे *वेळेचे काटेकोर अन् अचूक प्लॅनिंग !* रेल्वे क्राॅसिंगला फाटक उघडे पर्यंत वहानांना वाट पहायला लागते. काही वेळा रेल्वे लेट असते तर काही वेळा आपण लवकर आलेलो असतो. पण रेल्वे जावी, फाटक उघडावे आणि आपल्याला कणभरही वेटिंग न करावे लागणे. अशावेळी जो आनंद होतो तोच अनुभव काल प्रत्येक पिक-अप पाॅइंटला आम्ही घेतला. तीच बाब पुढील प्रत्येक टप्प्याची ! ब्रेकफास्ट, अकलूजला पोहोचण्याची वेळ, साइट सिइंग च्या वेळा, जेवणाची वेळ, परत निघण्याची व पुण्यात पोहोचण्याची वेळ ... *टायमिंगची इतकी परफेक्ट  किमया* साधली गेली कि त्याची तुलना सचिनने अफलातून मारलेल्या देखण्या स्ट्रेट-ड्राइव्हच्या टायमिंगशी व्हावी ! 

अकलूज आणि लावणी महोत्सव यांचे नाते सर्वश्रूत आहे. त्यामुळे कि काय या शहरा बाबद अनेकांच्या मनात वेगळीच अशी प्रतिमा अकारण तयार झाली होती. अकलाई देवी व श्री गणेश मंदिर आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शिवसृष्टी या स्थळांच्या भेटीने अकलूजची मनात असलेली प्रतिमा बदलली. एक आदर्श पर्यटन स्थळ किंवा must visit destination अशी गणना अकलूज ची केली जावी असे मला वाटते.  एखाद्या गावाचा सांस्कृतिक वारसा, तेथील परंपरा, चालीरीती, माणूसकीचा प्रवास वगैरे जाणून घ्यायचे असेल तर माणसाने त्या गावाने जपलेल्या, विकसित केलेल्या अशा ऐतिहासिक खाणाखूणांचा अभ्यास करावा असे मला उगाच वाटून गेले.

श्री वाघोले कुटूंबियांनी प्रेमाच्या व आपुलकीच्या भावनेने केलेले स्वागत, आदरातिथ्य, पाहूणचार हे सारे काही जणू *"यही तो है इस मिट्टी की खूषबू"* असे सांगून गेल्या.  त्या गावाची परंपरा जणू त्या सगळ्यांनी अलगद उलगडून दाखविली. त्यांचे आभार मानण्याची औपचारिकता करावी का असा प्रश्न मनात घोळत राहिला. मित्रांनो, आपल्या गृपच्या भविष्यात अनेक ट्रीप्स होतील, आपल्यातील कौटूंबिक नात्यांचे बंध नव्याने विकसित होतील, मैत्रीच्या नात्याला फुललेली पालवी नव्याने बहरेल पण *अकलूज ट्रीपची छबी मनाच्या एका कोपऱ्यात सदैव टवटवीत राहील ... अगदी परततांना श्री वाघोले कुटूंबियांनी भेटीदाखल दिलेल्या रोपट्यासारखी ..  हे मात्र नक्की !* 

टीप : वरील विवेचन तसेच शशांक व इतरांनी लिहिलेलया कमेंट्स वाचल्यानंतर आपण खूप काही मिस केले असे वाटणाऱ्यांनी पुढची ट्रीप चुकवू नये. 

श्री बिंदुमाधव भुरे. 
५ फेब्रुवारी २०२१

3 comments:

  1. Very selective but apt words in natural flow - from bottom of heart. Keep it up

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks Shashank for your appreciating & motivating words.

      Delete
    2. खूप सुंदर प्रवासवर्णन !मित्रांचा केलेला गौरवपूर्ण उल्लेख ही जमेची बाजू ट्रीपला न आलेल्यांना टीप अनुभवायला मिळाली त्याचबरोबर श्री भुरे यांनी केलेले ट्रीपसाठी चे आवाहन आपुलकी दर्शवते!

      Delete